शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

Rajasthan Political Crisis: काँग्रेसमध्ये बंडखोरी का केली? सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 09:32 IST

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या विकासासाठी माझ्या कामात नेहमी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अडथळे आणले जात होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना मी दिलेले आदेश मानू नका अशा बजावण्यात आलं होतं.उपमुख्यमंत्रिपदाचा काय फायदा आहे, जर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करु शकत नाहीगहलोत यांच्याशी नाराज नाही, इतकचं नाही तर मी काही विशेष ताकदही मागितली नव्हती

जयपूर – राजस्थानमधील राजकीय संघर्षात काँग्रेसनेसचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटरवरुन खरेपणाचा छळ होऊ शकतो पण पराभव होत नाही असं विधान केले होते, त्यानंतर आता सचिन पायलट यांची पहिली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत.

यात सचिन पायलट यांनी सांगितले की, राजस्थानच्या विकासासाठी माझ्या कामात नेहमी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अडथळे आणले. अधिकाऱ्यांना मी दिलेले आदेश मानू नका अशा बजावण्यात आलं होतं. त्यामुळे अशाप्रकारे माझी अडवणूक होत असेल तर उपमुख्यमंत्रिपदाचा काय फायदा आहे, जर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करु शकत नाही. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पायलट यांनी समर्थकांना विकासाची संधीही दिली नाही असं सांगितले. (Rajasthan Political Crisis)

त्याचसोबत अशोक गहलोत यांच्याशी नाराजीची कारणं काय या प्रश्नावर उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले, मी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी नाराज नाही, इतकचं नाही तर मी काही विशेष ताकदही मागितली नव्हती. फक्त जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण व्हावीत हीच माझी अपेक्षा होती. तसेच बंडखोरीचा पवित्रा घेण्यापूर्वी त्यांनी पक्षात चर्चा का केली नाही? या प्रश्नावरही सचिन पायलट यांनी उत्तर दिलं. काँग्रेस पक्षात अंतर्गत चर्चा करण्यासाठी कोणतंही व्यासपीठ राहिलं नाही, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी काहीच केले नाही असा आरोप त्यांनी केला.    

दरम्यान, सचिन पायलट यांनी अद्याप आपले पत्ते उघडले नसले तरी ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. ते आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार आहेत. तोपर्यंत ते दिल्ली जवळील मानेसरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसच्या १६ व इतर आमदारांशी रणनीती बनवण्यात गुंतले आहेत. माध्यमांसमोर जाण्यापूर्वी ते अमित शहा व नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात, असेही समजते. तोपर्यंत काँग्रेस व अपक्षांचे नेते फोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.  (Rajasthan Political Crisis)

सोनिया गांधी यांनी लिहिली पटकथा

काँग्रेसचे नेते सचिन पायलट, विश्वेंद्र सिंह, रमेश मीणा यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची पटकथा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या सांगण्यावरुन लिहिली गेली. विश्वेंद्र सिंह, रमेश मीणासह अन्य पायलट समर्थक भाजपसोबत मिळून गेहलोत सरकार पाडण्यासाठी रणनीती आखत असल्याची एक ऑडिओ आणि एक व्हिडिओ यांची माहिती सोनिया गांधी यांना देण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ऑडियोमध्ये सचिन पायलट यांचा आवाज होता आणि ते राज्यसभा निवडणुकीपूर्वीच गेहलोत सरकारला हटविण्याबाबत बोलत होते.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा