शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आखणार प्लॅन बी; राजस्थानात काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 13:16 IST

Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आता सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे आहे. पण या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे८६ काँग्रेस आमदारांसोबत अपक्ष आणि समर्थक आमदारांना घेऊन गहलोत राज्यपालांकडे पोहचतीलहायकोर्टाच्या निर्णयाने अशोक गहलोत आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढवलीमुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विधिमंडळ आमदारांची बैठक बोलावली

जयपूर – राजस्थानात गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात हायकोर्टाच्या निर्णयानं आणखी भर पडली आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लावून बसलेल्यांना शुक्रवारी या प्रकरणाचा छडा लागेल असं वाटत होतं. पण तसे झाले नाही. सचिन पायलट गटाकडून या खटल्यात केंद्र सरकारला पक्षकार करा म्हणून अर्ज करण्यात आला त्यामुळे आता केंद्र सरकारची बाजूही हायकोर्ट ऐकून घेणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी पायलट गटाला दिलेल्या नोटिशीबाबतही जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आता सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे आहे. पण या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाने सचिन पायलट गटाला दिलासा मिळाला असून अशोक गहलोत आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. काँग्रेस अपक्ष आमदारांना आपली पुढील रणनीतीची माहिती देणार आहेत, आमदारांची बैठक बोलवण्यात येईल. या बैठकीत सभागृहात बहुमत चाचणी अथवा कोणत्याही बंडखोरीपासून वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. काही आमदारांशी मुख्यमंत्री अशोक गहलोत स्वत: वन टू वन चर्चा करणार आहेत. (Rajasthan Political Crisis)

आमदारांच्या बैठकीत बहुमत अथवा त्यांच्या मनातलं जाणून घेतल्यानंतर अशोक गहलोत विधानसभा सभागृहात बहुमत चाचणी करण्यासाठी प्लॅन करतील. त्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. राज्यपालांनी जर सरकार अल्पमतात असल्याचं सांगितले तर त्यांच्यासमोर मुख्यमंत्री अशोक गहलोत आमदारांची ओळख परेड करतील. जवळपास ८६ काँग्रेस आमदारांसोबत अपक्ष आणि इतर समर्थक आमदारांना घेऊन गहलोत राज्यपालांकडे पोहचतील.

हायकोर्टाकडून जर विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईला योग्य ठरवलं गेले तर सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांचे संख्याबळ कमी होईल, सध्याच्या परिस्थितीत संख्या कमी झाली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत सहजरित्या बहुमत सिद्ध करु शकतात. सध्या १०० पेक्षा जास्त आमदार सरकारच्या पाठिशी असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गहलोत करत आहेत. जर पायलट गट बाजूला झाला तर सरकारला ९१ आमदारांचा पाठिंबा लागेल. अशा स्थितीत गहलोत यांचे पारडं जड होईल.(Rajasthan Political Crisis)

जर सभागृहात बहुमत चाचणी झाली नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सचिन पायलट आणि बंडखोर आमदारांच्या बाजूने लागला. तर अशोक गहलोत यांच्या अडचणीत वाढ होईल. समजा, विधानसभेत भाजपाकडे ७५ आमदारांचे संख्याबळ आहे. काँग्रेसचे १९ बंडखोर आणि बीटीपी आमदारांनी पाठिंबा दिला तर त्यांचे संख्याबळ ९९ पर्यंत पोहचते, त्यामुळे सध्यातरी कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोना काळात स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा? केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

...तर 'ते' धोकादायक ठरु शकतात; पृथ्वीच्या दिशेने आज येणार ३ संकटं, वैज्ञानिकांचं बारकाईनं लक्ष

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य?; काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ठाकरे सरकारमध्ये नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालयBJPभाजपाSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोत