शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आखणार प्लॅन बी; राजस्थानात काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 13:16 IST

Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आता सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे आहे. पण या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे८६ काँग्रेस आमदारांसोबत अपक्ष आणि समर्थक आमदारांना घेऊन गहलोत राज्यपालांकडे पोहचतीलहायकोर्टाच्या निर्णयाने अशोक गहलोत आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढवलीमुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विधिमंडळ आमदारांची बैठक बोलावली

जयपूर – राजस्थानात गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षात हायकोर्टाच्या निर्णयानं आणखी भर पडली आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लावून बसलेल्यांना शुक्रवारी या प्रकरणाचा छडा लागेल असं वाटत होतं. पण तसे झाले नाही. सचिन पायलट गटाकडून या खटल्यात केंद्र सरकारला पक्षकार करा म्हणून अर्ज करण्यात आला त्यामुळे आता केंद्र सरकारची बाजूही हायकोर्ट ऐकून घेणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी पायलट गटाला दिलेल्या नोटिशीबाबतही जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आता सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे आहे. पण या दरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमधील सरकार वाचवण्यासाठी प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाने सचिन पायलट गटाला दिलासा मिळाला असून अशोक गहलोत आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. काँग्रेस अपक्ष आमदारांना आपली पुढील रणनीतीची माहिती देणार आहेत, आमदारांची बैठक बोलवण्यात येईल. या बैठकीत सभागृहात बहुमत चाचणी अथवा कोणत्याही बंडखोरीपासून वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. काही आमदारांशी मुख्यमंत्री अशोक गहलोत स्वत: वन टू वन चर्चा करणार आहेत. (Rajasthan Political Crisis)

आमदारांच्या बैठकीत बहुमत अथवा त्यांच्या मनातलं जाणून घेतल्यानंतर अशोक गहलोत विधानसभा सभागृहात बहुमत चाचणी करण्यासाठी प्लॅन करतील. त्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. राज्यपालांनी जर सरकार अल्पमतात असल्याचं सांगितले तर त्यांच्यासमोर मुख्यमंत्री अशोक गहलोत आमदारांची ओळख परेड करतील. जवळपास ८६ काँग्रेस आमदारांसोबत अपक्ष आणि इतर समर्थक आमदारांना घेऊन गहलोत राज्यपालांकडे पोहचतील.

हायकोर्टाकडून जर विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईला योग्य ठरवलं गेले तर सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांचे संख्याबळ कमी होईल, सध्याच्या परिस्थितीत संख्या कमी झाली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत सहजरित्या बहुमत सिद्ध करु शकतात. सध्या १०० पेक्षा जास्त आमदार सरकारच्या पाठिशी असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गहलोत करत आहेत. जर पायलट गट बाजूला झाला तर सरकारला ९१ आमदारांचा पाठिंबा लागेल. अशा स्थितीत गहलोत यांचे पारडं जड होईल.(Rajasthan Political Crisis)

जर सभागृहात बहुमत चाचणी झाली नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सचिन पायलट आणि बंडखोर आमदारांच्या बाजूने लागला. तर अशोक गहलोत यांच्या अडचणीत वाढ होईल. समजा, विधानसभेत भाजपाकडे ७५ आमदारांचे संख्याबळ आहे. काँग्रेसचे १९ बंडखोर आणि बीटीपी आमदारांनी पाठिंबा दिला तर त्यांचे संख्याबळ ९९ पर्यंत पोहचते, त्यामुळे सध्यातरी कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कोरोना काळात स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा? केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

...तर 'ते' धोकादायक ठरु शकतात; पृथ्वीच्या दिशेने आज येणार ३ संकटं, वैज्ञानिकांचं बारकाईनं लक्ष

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य?; काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ठाकरे सरकारमध्ये नाराज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपाला दोन मुख्य प्रश्न; चीन संघर्षावरुनही केंद्र सरकारला घेरलं

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालयBJPभाजपाSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोत