शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

मनसेची मोर्चेबांधणी! २४ तासांत राज ठाकरेंनी केली डोंबिवली शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती

By प्रविण मरगळे | Published: February 02, 2021 3:14 PM

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात डोंबिवलीचा काही भाग येत असल्याने मंदार हळबे आणि राजेश कदम यांच्या पक्ष सोडण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

मुंबई – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना मनसेला जोरदार धक्के बसले आहेत. सोमवारी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला, त्यापाठोपाठ मनसेचे गटनेते आणि माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही मनसेला रामराम केला, कदम आणि हळबे यांच्या पक्ष सोडण्याने मनसेला डोंबिवलीत मोठं खिंडार पडल्याचं चित्र निर्माण झालं.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात डोंबिवलीचा काही भाग येत असल्याने मंदार हळबे आणि राजेश कदम यांच्या पक्ष सोडण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राजेश कदम हे मनसेचे संस्थापक सदस्य होते, अनेक आंदोलनात त्यांनी सत्ताधारी शिवसेनेविरोधात भूमिका घेत रस्त्यावर उतरले होते, मात्र सोमवारी अचानक राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितले.

प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही", पक्षाच्या गळतीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

तर दुसरीकडे मंदार हळबे यांनीही मनसे सोडण्याचा निर्णय घेतला, मंदार हळबे यांना मनसेने दोनदा विधानसभेचे तिकीट दिलं होतं, यंदाच्या निवडणुकीत मनसे उमेदवार मंदार हळबे यांना ४५ हजार मतदान झालं होतं, मंदार हळबे हे मनसेचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. मंदार हळबेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे, त्यामुळे कंडोमपा निवडणुकीत मनसेला जोरदार फटका बसला आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली, यात आमदार राजू पाटील यांचीही उपस्थिती होती, यावेळी मनोज घरत यांना मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले.

'...म्हणून मी भाजपात प्रवेश केला'; मनसेच्या नगरसेवकाने सांगितली अखेर 'मन की बात'

काय म्हणाले मंदार हळबे?

मी लहानपणापासून भाजपासाठी काम केलं आहे. तसेच मला राम मंदिर उभारणीच्या कामापासून आपण काहीसे दूर राहत असल्याची भावना होती. सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी भाजपात प्रवेश करत असल्याचं मंदार हळबे यांनी सांगितलं. तसेच १० वर्षे ज्या पक्षाने नेतृत्वाची संधी दिली, त्या पक्षाबद्दल कुठलीही नाराजी नाही, असंही मंदार हळबे यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं आहे.

तर राजकीय आमिषापोटी राजेश कदम आणि मंदार हळबे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष सोडणाऱ्यांची पक्षावर नाराजी नव्हती असं ते म्हणतं आहेत. तरीही ते दुसऱ्या पक्षात गेले. मग यामागे समोरच्या पक्षाकडून आमीष दिलं गेलं नाही, तर मग इतर दुसरं कारण काय असू शकतं? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.  

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरे