शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

Pegasus spyware: नरेंद्र मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाली, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:07 IST

Pegasus spyware attack: केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे

ठळक मुद्दे'भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही'

नवी दिल्ली: सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ माजलाय. केंद्र सरकारने इस्रायलच्या पेगासस(Pegasus spyware) या सॉफ्टवेअरद्वारे फोन टॅप केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. दरम्यान, या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं आहे. 'भाजप सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, उलट मनमोहन सिंग यांच्याच काळात फोन टॅप झाले', असा दावा फडणवीसांनी केलाय. 

पेगसासद्वारे भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि उद्योजकांचे फोन टॅप केल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यांनी केला. यासंबंधी बातम्या समोर आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. 'फोन टॅपिंग नरेंद्र मोदींच्या काळात नाही, तर तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाली, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना नरेंद्र मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे. पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मनमोहन सिंगांकडून समर्थनफडणवीस पुढे म्हणाले की, भारतातील टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळ फोन टॅपिंग करण्याची गरजच नाही. सबंधित विभागानं अश्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, आणि जे काम झालंय ते लिगली झालंय, अस त्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

देशाच्या बदनामीचा अजेंडाफडणवीस पुढे म्हणाले की, पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण चर्चा फक्त भारताची होत आहे. हे जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून होत आहे. एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग मिळतीये आणि त्यातून एक बदनामीचा अजेंडा राबवला जातोय. हे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस