शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
3
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
4
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
5
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
6
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
7
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
8
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
9
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
10
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
11
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
12
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
13
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
14
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
16
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
17
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
18
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
19
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
20
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
Daily Top 2Weekly Top 5

Pegasus spyware: नरेंद्र मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळात फोन टॅपिंग झाली, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:07 IST

Pegasus spyware attack: केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे

ठळक मुद्दे'भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही'

नवी दिल्ली: सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात फोन टॅपिंग प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ माजलाय. केंद्र सरकारने इस्रायलच्या पेगासस(Pegasus spyware) या सॉफ्टवेअरद्वारे फोन टॅप केल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. दरम्यान, या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं आहे. 'भाजप सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत, उलट मनमोहन सिंग यांच्याच काळात फोन टॅप झाले', असा दावा फडणवीसांनी केलाय. 

पेगसासद्वारे भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि उद्योजकांचे फोन टॅप केल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय माध्यांनी केला. यासंबंधी बातम्या समोर आल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. 'फोन टॅपिंग नरेंद्र मोदींच्या काळात नाही, तर तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाली, असा आरोप त्यांनी केला. तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना नरेंद्र मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशान अधिवेशनाच कामकाज डिस्टर्ब केल जात आहे. पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अश्या कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मनमोहन सिंगांकडून समर्थनफडणवीस पुढे म्हणाले की, भारतातील टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळ फोन टॅपिंग करण्याची गरजच नाही. सबंधित विभागानं अश्या बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, आणि जे काम झालंय ते लिगली झालंय, अस त्यांनी सांगितलं होतं, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

देशाच्या बदनामीचा अजेंडाफडणवीस पुढे म्हणाले की, पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण चर्चा फक्त भारताची होत आहे. हे जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतून होत आहे. एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग मिळतीये आणि त्यातून एक बदनामीचा अजेंडा राबवला जातोय. हे भारताला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे,  असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस