शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घराण्याचा तरी मान राखावा”; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:02 IST

BJP Devendra Fadnavis Demand HM Anil Deshmukh Resignation: CBI चौकशीत सगळं उघड होईल. CBI चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र कसं खोटं आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला असं सांगत फडणवीसांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली.

ठळक मुद्देहायकोर्टाच्या निर्णयावर शरद पवारांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते मोठे नेते आहेतअनिल देशमुखांनी या पदावर राहणं योग्य नाही. चौकशीतून ते निर्दोष बाहेर पडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल.मुख्यमंत्र्यांनी पदाचा मान राखत, ज्या घराण्यातून ते येतात त्याचा मान राखत त्यांनी या प्रकरणात भूमिका घेतली पाहिजे

मुंबई – राज्यात सध्या सुरु असणाऱ्या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे, ती या पदाला शोभणारी नाही, सचिन वाझेची पहिल्यांदा पाठराखण केली, त्यानंतर वाझे प्रकरणात जे काही समोर आलं तेव्हापासून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं नाही. माध्यमांसमोर मुख्यमंत्री कोणत्याही प्रकरणावर भाष्य करत नाही हे आश्चर्य आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन आश्चर्यचकीत करणारं आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे.(BJP Devendra Fadnavis Target CM Uddhav Thackeray over High court ordered HM Anil Deshmukh CBI Probe)

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता, हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत, या निर्णयाचं स्वागत करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पदाचा मान राखत, ज्या घराण्यातून ते येतात त्याचा मान राखत त्यांनी या प्रकरणात भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा त्यांच्याविरोधात जनतेमध्ये संशय निर्माण होईल असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!

अनिल देशमुखांनी पदावर राहणं योग्य नाही

गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा घेतलाच पाहिजे. अनिल देशमुखांनी या पदावर राहणं योग्य नाही. चौकशीतून ते निर्दोष बाहेर पडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल. हायकोर्टाने अतिशय योग्य निर्णय दिला आहे. १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या चौकशीत काही दोष आढळला तर FIR नोंदवला जावा. हफ्ते वसुलीचं काम सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं. याबद्दल हायकोर्टाने कडक पाऊल उचललं आहे. त्या निर्णयाचं स्वागत करतो, CBI चौकशीत सगळं उघड होईल. CBI चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र कसं खोटं आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला असं सांगत फडणवीसांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं?

शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष  

हायकोर्टाच्या निर्णयावर शरद पवारांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते मोठे नेते आहेत, एखाद्या पक्षानं नैतिकता पाळली पाहिजे. ती मोठ्या नेत्याची जबाबदारी असते. कोर्टाने अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा असेल ते शरद पवार घेतील. त्या पक्षातील निर्णय शरद पवारांशिवाय दुसरा कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेParam Bir Singhपरम बीर सिंगDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSharad Pawarशरद पवार