शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:56 IST

Pankaja Munde call important meeting in Mumbai: पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

ठळक मुद्देआतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती

मुंबई: काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) झाला. त्यात महाराष्ट्रातून चार नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. विशेष म्हणजे, भाजप नेत्या प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना त्यांना डावलून राज्यसभा खासदार भागवत कराड(Bhagwat Karad) यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे अनेक पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी मंगळवारी म्हणजेच 13 जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ही माहिती दिली. 

मस्के यांनी सांगितल्यानुसार, पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या वरळी येथील कार्यालयात या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहेत. विशेष म्हणजे, यात बीडमधील सर्वच 11 तालुकाध्यक्षांचाही समावेश आहे. त्यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपवले आहेत.

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना

या सर्व नाराजी नाट्यादरम्यान पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांच्याशी त्या चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रीतम मुंडे या मंत्रिपदाच्या दावेदार आणि पात्र असतानाही त्यांना डावलण्यात आल्याबद्दल त्या नाराजी बोलून दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.

'भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही'

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराज असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले होते.  भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडेंसह हिना गावित आणि इतरांचीही नावे चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असते. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असेच होते. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलMumbaiमुंबई