शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:56 IST

Pankaja Munde call important meeting in Mumbai: पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

ठळक मुद्देआतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती

मुंबई: काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) झाला. त्यात महाराष्ट्रातून चार नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. विशेष म्हणजे, भाजप नेत्या प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना त्यांना डावलून राज्यसभा खासदार भागवत कराड(Bhagwat Karad) यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे अनेक पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी मंगळवारी म्हणजेच 13 जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ही माहिती दिली. 

मस्के यांनी सांगितल्यानुसार, पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या वरळी येथील कार्यालयात या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहेत. विशेष म्हणजे, यात बीडमधील सर्वच 11 तालुकाध्यक्षांचाही समावेश आहे. त्यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपवले आहेत.

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना

या सर्व नाराजी नाट्यादरम्यान पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांच्याशी त्या चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रीतम मुंडे या मंत्रिपदाच्या दावेदार आणि पात्र असतानाही त्यांना डावलण्यात आल्याबद्दल त्या नाराजी बोलून दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.

'भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही'

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराज असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले होते.  भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडेंसह हिना गावित आणि इतरांचीही नावे चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असते. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असेच होते. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलMumbaiमुंबई