शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:56 IST

Pankaja Munde call important meeting in Mumbai: पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे

ठळक मुद्देआतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती

मुंबई: काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) झाला. त्यात महाराष्ट्रातून चार नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. विशेष म्हणजे, भाजप नेत्या प्रीतम मुंडे(Pritam Munde) यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना त्यांना डावलून राज्यसभा खासदार भागवत कराड(Bhagwat Karad) यांना मंत्रिपद देण्यात आले. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या नाराजीमुळे अनेक पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी मंगळवारी म्हणजेच 13 जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ही माहिती दिली. 

मस्के यांनी सांगितल्यानुसार, पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या वरळी येथील कार्यालयात या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पंकजा मुंडे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान, आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 49 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहेत. विशेष म्हणजे, यात बीडमधील सर्वच 11 तालुकाध्यक्षांचाही समावेश आहे. त्यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपवले आहेत.

पंकजा मुंडे दिल्लीला रवाना

या सर्व नाराजी नाट्यादरम्यान पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांच्याशी त्या चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रीतम मुंडे या मंत्रिपदाच्या दावेदार आणि पात्र असतानाही त्यांना डावलण्यात आल्याबद्दल त्या नाराजी बोलून दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.

'भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही'

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाराज असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले होते.  भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडेंसह हिना गावित आणि इतरांचीही नावे चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असते. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असेच होते. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकंच मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजप मला संपवत आहे असे मला वाटत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलMumbaiमुंबई