शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 08:56 IST

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप सत्ताधारी नेत्यांचा आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेश, राजस्थान यानंतर भाजपाचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळणार असल्याची चर्चामध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडल्यानंतर राजस्थानातही गहलोत सरकारवर संकट विरोधी पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दिल्लीत हालचाली सुरु असल्याचा आरोप

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केल्याचं या टिझरमधून पाहायला मिळतं.

या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप सत्ताधारी नेत्यांचा आहे.

देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडल्यानंतर त्याठिकाणी भाजपाचे सरकार स्थापन करण्यात आले, ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन त्यांच्या समर्थकांना मंत्रिपदे देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार अल्पमतात गेले. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. यानंतर अलीकडेच राजस्थानमध्ये सुरु असलेल्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. (Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानंतर तेथील अशोक गहलोत सरकारवर संकट निर्माण झालं आहे, राजस्थानात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान यानंतर भाजपाचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळणार असल्याचंही काही नेत्यांकडून दावा केला जातो, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चेवरुन विरोधकांना खुलं चॅलेंज दिलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस