शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 08:56 IST

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप सत्ताधारी नेत्यांचा आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेश, राजस्थान यानंतर भाजपाचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळणार असल्याची चर्चामध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडल्यानंतर राजस्थानातही गहलोत सरकारवर संकट विरोधी पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दिल्लीत हालचाली सुरु असल्याचा आरोप

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केल्याचं या टिझरमधून पाहायला मिळतं.

या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप सत्ताधारी नेत्यांचा आहे.

देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडल्यानंतर त्याठिकाणी भाजपाचे सरकार स्थापन करण्यात आले, ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन त्यांच्या समर्थकांना मंत्रिपदे देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार अल्पमतात गेले. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. यानंतर अलीकडेच राजस्थानमध्ये सुरु असलेल्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. (Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानंतर तेथील अशोक गहलोत सरकारवर संकट निर्माण झालं आहे, राजस्थानात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान यानंतर भाजपाचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळणार असल्याचंही काही नेत्यांकडून दावा केला जातो, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चेवरुन विरोधकांना खुलं चॅलेंज दिलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस