शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

भाजपाच्या ‘मिशन रिपीट’ला विरोधकांचा सुरुंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:18 AM

अनेक युद्धांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या हरियाणात निवडणुकांच्या रणदुदुंभी वाजू लागल्या आहेत.

- सुहास शेलारअंबाला : अनेक युद्धांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या हरियाणात निवडणुकांच्या रणदुदुंभी वाजू लागल्या आहेत. २०१४ साली एकहाती सत्ता स्थापन केलेल्या भाजपाचे ‘पानिपत’ करण्यास विरोधक सज्ज झाले आहेत. भाजपाने पुन्हा एकदा हरियाणा जिंकण्यासाठी ‘मिशन रिपीट’चा नारा लगाला आहे. मात्र, आठ दिवसांवर आलेल्या ‘जिंद’ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी आखलेले डावपेच, कुरघोडीचे राजकारण आणि प्रचार तोफांच्या फैरी पाहता यंदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपासाठी अवघड असल्याचेच चित्र सध्या आहे.भाजपाने स्थानिक पक्ष इंडियन नॅशनल लोक दल, हरियाणा जनहित काँग्रेस, तसेच काँग्रेस आणि बसपाला धूळ चारत लोकसभेच्या दहापैकी सात जागांवर विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीतही ४७ जागा जिंकत सत्ता स्थापन केली.मात्र, गेल्या पाच वर्षांत चित्र पालटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे संप, शेतकºयांचे आंदोलन, सराफ व्यापाºयांची नाराजी, जाट आरक्षणाचा प्रश्न थोपवताना झालेल्या हिंसेमुळे येथील सर्वसामान्य जनतेत भाजपाविषयी प्रचंड रोष आहे.नुकत्याच झालेल्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपाने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे तीन राज्ये हातची गेल्यानंतर किमान हरियाणात तरी सत्ता राखण्याच्या भाजपाच्या आत्मविश्वासाला उभारी मिळाली आहे. तरी भाजपाला शिकस्त देण्यास विरोधकांनीही कंबर कसली आहे.हरियाणात यंदा आम आदमी पार्टी, जननायक जनता पार्टी, लोकतंत्र सुरक्षा पार्टी हे पक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे. या मतविभाजनाचा फायदा करून घेण्यासाठी स्थानिक पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.काँग्रेसने रणजीत सिंह सुरजेवाला यांच्याकडे हरियाणाची अप्रत्यक्ष कमान सोपविली आहे. जिंद पोटनिवडणुकीसाठी दिग्गजांची नावे डावलून सुरजेवाला यांना दिलेली उमेदवारीही, याच रणनीतीचा एक भाग आहे. एकंदरीत हरियाणात भाजपाच्या गडाला सुरुंग लावण्यास विरोधकांनी तयारी केल्याचे दिसूनयेत आहे. मात्र, विरोधकांचे डाव हाणून पाडण्यासाठी भाजपा कोणते गनिमी कावे वापरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.>खट्टर यांची फौज मैदानातहरियाणातील पाच महानगरपालिका जिंकून भाजपाने ‘मिशन रिपीट’चा नारा लगावला आहे. विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार खट्टर यांनी शहर आणि ग्रामीण अशी विभागवार कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा