शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

UP Election 2022: “उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळलीय, आम्ही ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री देऊ”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 12:23 IST

UP Election 2022: जनतेने संधी दिल्यास ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्री देऊ, असे ओमप्रकाश राजभर यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशची जनतेला भाजपला कंटाळलीयआम्ही ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री, २० उपमुख्यमंत्री देऊओमप्रकाश राजभर यांचा अजब दावा

लखनऊ: पुढील वर्षी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी विविध पक्षांकडून आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, राजकारण हळूहळू तापताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता अनेक पक्षांनी भाजपविरोधात मोट बांधायला घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. उत्तर प्रदेशची जनतेला भाजपला कंटाळली आहे. जनतेने संधी दिल्यास ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्री देऊ, असे ओमप्रकाश राजभर यांनी म्हटले आहे. (omprakash rajbhar says we will give 5 cm and 20 deputy cm in 5 years after up election)

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमप्रकाश राजभर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, भाजपसोबत युती करणार नाही. तसचे एनडीए मध्ये सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच म्हटले होते. यानंतर आता ओमप्रकाश राजभर यांनी अजब दावा करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षाचे सरकार आले, तर ते वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देण्यात येईल. पाच वर्षांत पाच मुख्यमंत्री आणि प्रत्येक वर्षांत चार उपमुख्यमंत्री बनवले जातील, असे म्हटले आहे. 

मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही!

उत्तर प्रदेशची जनतेला भाजपला कंटाळली

उत्तर प्रदेशची जनतेला भाजपला कंटाळली आहे. आताच्या घडीला भाजपला कोणी मतदान करणार नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल, असा दावा करत राजभर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. यावेळी राजभर यांनी निषाद पक्षाच्या संजय निषाद यांच्या मुलावरही जोरदार निशाणा साधला. तुम्ही भाजपाकडे भीक का मागत आहात. त्याऐवजी तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, असे राजभर म्हणाले.

राज्य सहकारी बँकेची दमदार कामगिरी; कोरोना काळात ३६९ कोटींचा निव्वळ नफा

भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’

भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मागासवर्ग समाजाला सामावून न घेणारी भाजप कोणत्या तोंडाने मते मागायला जाणार आहे, अशी विचारणा करत भाजपला पराभूत करण्यासाठी भागीदारी संकल्प मोर्चा तयार करण्यात आला असून, आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे राजभर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाElectionनिवडणूक