शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

ओबीसी समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं: डॉ. अमोल कोल्हे

By प्रविण मरगळे | Published: September 21, 2020 1:39 PM

केंद्राची आता पॉलिसी पाहिली तर अनेक गोष्टी खासगीकरणाकडे जात असताना आरक्षण महत्त्वाचं असताना युवकांनी गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला पाहिजे असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे

मुंबई – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिनी दिल्याने राज्यात संतापाची भावना आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यास कमी पडल्याचा आरोप केला जातो. त्यात राज्यात पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आल्याने मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच जर वेळ पडली तर ओबीसी समाजानं मन मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना सामावून घ्यावं असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मराठा आरक्षण मिळालचं पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्याने त्यात दुमत नाही, केंद्र सरकार या प्रश्नी हस्तक्षेप करु शकतं, महाराष्ट्राचे खासदार याबाबत संसदेत मुद्दा उपस्थित करत आहेत. कोणत्याही मार्गाने का होईना मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं त्यांनी सांगितले.

तसेच यात जे काही योग्य आहे ते करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले आहे. पण २०११ च्या जगणनेनुसार ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण कमी आहे. पण जर वेळ आली तर ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. त्याचसोबतच केंद्राची आता पॉलिसी पाहिली तर अनेक गोष्टी खासगीकरणाकडे जात असताना आरक्षण महत्त्वाचं असताना युवकांनी गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला पाहिजे असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

शेतकरी नेत्यांशी चर्चा करुन विधेयक आणलं असतं तर बरं झालं असतं

कृषि विधेयकाचा अभ्यास केला की हे क्षेत्र कॉर्पोरेट कंपन्यांच्या हाती देण्याचा डाव तर नाही ना अशी शंका येते. स्पर्धा असावी, कृषी उत्पन्न बाजार समितीली सक्षम व्यवस्था दिली आहे का? शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. शरद पवार हे १० वर्ष देशाचे कृषीमंत्री होते, त्यांच्या काळात अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले गेले, हे विधेयक आणताना शरद पवारांसह अनेक शेतकरी संघटनेच्या नेत्यांची चर्चा करुन आणलं असतं तर बरं झालं असतं. तसेच कांद्याची निर्यात बंदी हटलीच पाहिजे ही आमची भूमिका आहे असंही अमोल कोल्हे म्हणाले.

देशासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न  

केंद्र सरकारने १ सप्टेंबरपासून महाराष्ट्राला येणारी मदत थांबवली आहे. पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर सुविधा थांबवल्या आहेत, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना कोविडमधून बाहेर पडताना केंद्राने महाराष्ट्राची मदत थांबवणे दुर्देवी आहे असा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला आहे. तसेच बॉलिवूडमधील वादावर भाष्य करताना एखाद्या अभिनेत्रीला किती महत्त्व द्यायचं ते आपण ठरवावं, देशासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे अशा शब्दात कंगना राणौतला फटकारलं आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, चित्रपटसृष्टीभोवती शंका उपस्थित केली जाते, ही इंडस्ट्री ५ लाख लोकांना रोजगार देते, ड्रग्स प्रकरणात जे काही समोर येत आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई झालीच पाहिजे. असंघटित कामगारांसारखे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचा दर्जा नाही, जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर असता तेव्हा सगळे विचारतात, मराठी इंडस्ट्रीमध्ये ड्र्ग्सचा विळखा असेल हे वाटत नाही. ड्रग्सच्या आहारी जाणं दुर्देवी आहे. कारण अनेक युवक कलाकारांकडे आदर्श म्हणून बघत असतात असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.       

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जाती