शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

कल्याणमध्ये आगरी कार्डाभोवती राष्ट्रवादी-शिवसेनेचा पिंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:00 IST

शिवसेनेचा विकासावर भर; आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

- प्रशांत मानेशिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यातील थेट लढत यंदा कधी नव्हे एवढी आगरी मतांवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या महापालिका, नगरपालिका, ग्रामीण राजकारणात, तसेच प्रकल्पांवेळी झालेल्या अन्यायात शिवसेनेने या समाजाला डावलल्याची भावना त्या समाजात तीव्र आहे. या समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याची चित्रफीतही या काळात व्हायरल होते आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरील लढाईत या समाजाने काय कमावले, हा प्रश्नही प्रचारात तीव्र बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आमचं ठरलंय’ असा मेसेज व्हायरल होतोय आणि त्यामुळे ‘त्यांचं काय ठरलंय’ याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिवसेना-राष्ट्रवादीकडून सुरू आहे. रिंगणात जरी श्रीकांत शिंदे व बाबाजी पाटील असले, तरी मुलामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वत: न लढता काम करू असा शब्द दिल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.आगरी, मराठा-कुणबी व अन्य बहुभाषिकांसह मुस्लिम, दलित, सिंधी व उत्तर भारतीयांची मते येथे निर्णायक असली, तरी भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित, विकास विरुद्ध जात हेच मुद्दे प्रामुख्याने प्रचारात आहेत. श्रीकांत शिंदे मागच्या वेळी राजकारणात नवे होते. गेल्या पाच वर्षांत तेही राजकारणातील बारकावे शिकले आहेत. उल्हासनगर, डोंबिवली पश्चिम, मलंगगड, दिवा, कल्याण ग्रामीण येथील सेनेच्या रॅलीत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. शक्तिप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे संबंध उल्हासनगरच्या प्रचारावेळी ताणले गेले होते. मात्र, आता ते सुधारल्याने दोन्ही पक्ष प्रचारात उतरले आहेत.राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते गणेश नाईक स्वत: उतरले आहेत. मेळाव्यांबरोबर वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर आहे. नाईक यांनी बाबाजींना सोबत घेत, डोंबिवलीत सेना-भाजपच्या आगरी नगरसेवकांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. नेवाळीत विमानतळाच्या जागेवरून झालेला हिंसाचार आणि तेथे भूमिपुत्रांवर झालेला अन्याय, तेथील आक्रोश चर्चेत आहे. पालिकेतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा न सुटल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीला मनसेची साथ असली, तरी पाठिंबा देण्यावरून त्या पक्षात दोन गट पडल्याचे चित्र आहे.वाहतूककोंडी, रेल्वेच्या समस्या, रुग्णालय सुविधांचा बोजवारा आदी प्रश्न कायम आहेत. प्रचारात आमचा भर वैयक्तिक भेटीगाठींवर आहे. रॅली काढून वाहतूककोंडी करून नागरिकांना आम्ही त्रास देत नाही. स्थानिक, आगरी समाजाचा असलो, तरी आमच्याकडून जातीचा प्रचार केला जात नाही.- बाबाजी पाटील, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस.रॅली व घरोघरीच्या प्रचाराला चांगली साथ लाभत आहे. मतदार सुशिक्षित असून, आगरी समाज हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आहे. आताही त्यांची साथ लाभेल, यात शंका नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन काम करत आहोत. समाजाचा विकास शिवसेनाच करू शकते, असा विश्वास मतदारांना आहे..- डॉ. श्रीकांत शिंदे, उमेदवार शिवसेनाकळीचे मुद्दे२७ गावे वगळण्याच्या मुद्द्यासह नेवाळी आंदोलनातील भूमिपुत्रांवरील अन्याय, सत्तेत सेनेकडून डावलला गेलेलाआगरी समाज.रेल्वे प्रवाशांचे प्रश्न, कळवा-ऐरोली लिंकमार्ग, ठाकुर्ली टर्मिनस, पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण यार्डाच्या रिमॉडेलिंग प्रकल्पांची रखडगाथा.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस