शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Flood: “केंद्राने गुजरातला तातडीने १ हजार कोटी दिले, आता महाराष्ट्रालाही मदत करावी”: पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:11 IST

Maharashtra Flood: आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: राज्यात विविध ठिकाणी झालेल्या प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ठाकरे सरकार मोठी घोषणा करू शकते, असे सांगितले जात आहे. त्यातच आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. (ncp rohit pawar says central govt should help maharashtra in flood situation) 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्धव ठाकरेंपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेकांनी चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. यानंतर आता मदत आणि पूनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्राकडे मदतीचे आवाहन केले आहे. 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी

अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात पशुधनही वाहून गेलं. तसंच हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी ₹ दिले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. राज्यपाल भतग सिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Politicsराजकारणchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSatara Floodसातारा पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार