शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

Maharashtra Flood: “केंद्राने गुजरातला तातडीने १ हजार कोटी दिले, आता महाराष्ट्रालाही मदत करावी”: पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:11 IST

Maharashtra Flood: आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: राज्यात विविध ठिकाणी झालेल्या प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ठाकरे सरकार मोठी घोषणा करू शकते, असे सांगितले जात आहे. त्यातच आता राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. (ncp rohit pawar says central govt should help maharashtra in flood situation) 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्धव ठाकरेंपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेकांनी चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. यानंतर आता मदत आणि पूनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्राकडे मदतीचे आवाहन केले आहे. 

मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम

त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी

अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात पशुधनही वाहून गेलं. तसंच हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी ₹ दिले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

राज्यपाल पुस्तक चाळूनच काम करत असतात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच राज्यघटनेचे पुस्तक चाळून काम करत असतात. मात्र, त्याचे राज्यघटनेते पुस्तक या पुरात वाहून गेले की काय हे पाहावे लागेल, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलीय. राज्यपाल भतग सिंह कोश्यारी यांना जास्त कळते असे मी मानतो, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल दौऱ्यावर गेलेले आहेत. आता ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असेच आम्ही मानतो, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Politicsराजकारणchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाSatara Floodसातारा पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार