शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

राज्यात राजकीय घडामोड! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 20:14 IST

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देशस्त्रक्रियेनंतर आणि मोदी-उद्धव भेटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार दिल्लीला गेले आहेत. आजच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं पत्र आलं समोरभाजपासोबत युती करावी असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली मागणी

मुंबई – राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच पडला असेल. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहिल्या तर महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र नाही. त्यातच काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची भूमिका वारंवार मांडत आहे. तर शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी(NCP) दोन्ही पक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे.

यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राजकीय खळबळ माजवली आहे. या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबत युती करावी त्यातच शिवसेनेला फायदा आहे असं म्हटलं आहे. सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे शरद पवारांची(Sharad Pawar) दिल्लावारी नेमकी कशासाठी आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दुपारी विमानाने शरद पवार दिल्लीला रवाना झाले, सायंकाळी ते दिल्लीत पोहचले आहेत. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शरद पवार दिल्लीला गेले आहेत. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) भेटीनंतर पवारांचा दिल्लीदौरा होत आहे. पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. केरळमधील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत पवारांची नियोजित भेट होती त्यासाठी ते दिल्लीत गेले असं सांगितलं जात असलं तरी राज्यातील राजकारणात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार दिसत असलं तरी सरकारमध्ये खूप घडामोडी घडत आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. परंतु यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० मिनिटं वैयक्तिक भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी शिवसेना हा धोका देणारा पक्ष नाही असं म्हणत इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिला होता त्याचा दाखला शरद पवारांनी दिला भाजपासोबत शिवसेना जाणार की राष्ट्रवादी यावरही राजकीय चर्चा सुरू आहे. शरद पवार दिल्लीत किती दिवस असणार याबाबत स्पष्टता नाही. या दिल्ली दौऱ्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार का? हेदेखील अद्याप कळालं नाही.

प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय?

आजच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.

सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीpratap sarnaikप्रताप सरनाईक