शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात राजकीय घडामोड! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल, विविध चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 20:14 IST

सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत.

ठळक मुद्देशस्त्रक्रियेनंतर आणि मोदी-उद्धव भेटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार दिल्लीला गेले आहेत. आजच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं पत्र आलं समोरभाजपासोबत युती करावी असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली मागणी

मुंबई – राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच पडला असेल. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहिल्या तर महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र नाही. त्यातच काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची भूमिका वारंवार मांडत आहे. तर शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी(NCP) दोन्ही पक्षांनी सावध पवित्रा घेतला आहे.

यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राजकीय खळबळ माजवली आहे. या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबत युती करावी त्यातच शिवसेनेला फायदा आहे असं म्हटलं आहे. सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय धुरळा उडलेला असतानाच आता दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे शरद पवारांची(Sharad Pawar) दिल्लावारी नेमकी कशासाठी आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दुपारी विमानाने शरद पवार दिल्लीला रवाना झाले, सायंकाळी ते दिल्लीत पोहचले आहेत. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शरद पवार दिल्लीला गेले आहेत. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) भेटीनंतर पवारांचा दिल्लीदौरा होत आहे. पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. केरळमधील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत पवारांची नियोजित भेट होती त्यासाठी ते दिल्लीत गेले असं सांगितलं जात असलं तरी राज्यातील राजकारणात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार दिसत असलं तरी सरकारमध्ये खूप घडामोडी घडत आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. परंतु यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० मिनिटं वैयक्तिक भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी शिवसेना हा धोका देणारा पक्ष नाही असं म्हणत इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिला होता त्याचा दाखला शरद पवारांनी दिला भाजपासोबत शिवसेना जाणार की राष्ट्रवादी यावरही राजकीय चर्चा सुरू आहे. शरद पवार दिल्लीत किती दिवस असणार याबाबत स्पष्टता नाही. या दिल्ली दौऱ्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार का? हेदेखील अद्याप कळालं नाही.

प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय?

आजच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.

सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीpratap sarnaikप्रताप सरनाईक