शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 5:52 AM

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.मोदी व शहा यांच्या भाषणांविषयी काँग्रेसने आधीच आयोगाकडे तक्रार केली आहे. यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल अन्य विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बसपच्या नेत्या मायावती यांनी तर या दोघांवर कारवाई का होत नाही, असा थेट सवालच केला आहे.त्यातच मोदी यांच्या संपत्ती व मालमत्तेविषयी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला. सुप्रीम कोर्टात दाखल साकेत गोखले यांच्या जनहित याचिकेच्या आधारे काँग्रेसने मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिल्याची तक्रार केली. या आधी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या गेल्या व या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांतील माहिती परस्परविरोधी असल्याची तक्रार करीत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.नरेंद्र मोदी यांनी २00७च्या प्रतिज्ञापत्रात गांधीनगरच्या सेक्टर १ मध्ये ४११ क्रमांकाचा भूखंड आपल्याकडे आहे व त्याचे क्षेत्रफळ ३२६.२२ चौरस मीटर असल्याचे म्हटले होते. त्यावरील बांधकामाची किंमत ३0 हजार ३६३ रुपये दाखविली होती, पण २0१२च्या निवडणुकीत याचा उल्लेखच प्रतिज्ञापत्रातून गायब झाला. तो विकला का, याचाही उल्लेख त्यात केला नाही. त्याऐवजी ४0१ ए या भूखंडाचा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे मोदी यांनी नमूद केले.त्यामुळे आधी दाखविलेला ४११ क्रमांकाचा भूखंड कुठे गेला व त्याऐवजी ४0१ ए भूखंड कसा आला, असा प्रश्न काँग्रेसने विचारला. गेल्या, २0१४च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी यांनी ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेख केला नव्हता, तसेच ३१ मार्च, २0१८ रोजी मोदी यांनी मालमत्तेची जी माहिती वेबसाइटवर टाकली, त्यातही भूखंड क्रमांक ४0१ ए चा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे नमूद केले आहे. जमिनीचे रेकॉर्ड तपासले असता, त्यात ४0१ ए क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच नसल्याचे आढळल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तिथे ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच आहे, तसेच ४0१ क्रमांकाचा भूखंड अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावे असून, त्यांनीही ४0१ क्रमांकाच्या भूखंडावर एकचतुर्थांश मालकी हक्क असल्याचे म्हटले आहे. या भूखंडावर जेटली व मोदी यांचा प्रत्येकी एक चतुर्थांश मालकी हक्क असेल, तर मग दोन्ही भूखंडांचे क्षेत्रफळ सारखे कसे काय, असा काँग्रेसचा सवाल आहे.त्यामुळे आयोगाने कारवाई करून या भूखंडाच्या मालकी हक्काचा गोंधळ उघड करावा आणि नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे, हे सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.>प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारापंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध एकापाठोपाठ एक पुरावे समोर आणून त्यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेस आता निवडणूक आयोगावर दबाव आणण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोगाने या पुराव्यांच्या आधारे कारवाई न केल्यास प्रसंगी आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असे काँग्रेसने म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस