शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 23:21 IST

मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल २0१९ रोजी मतदान होणार आहे.

- विजय मांडे कर्जत : लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, लगोलग आचारसंहिताही लागू झाली. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल २0१९ रोजी मतदान होणार आहे. मावळ मतदारसंघातून गेल्यावेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी दिली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे उमेदवारीसाठी पुढे करून चाचपणी करण्यात येत आहे.पूर्वी रायगड लोकसभा मतदारसंघ होता. बॅ. ए. आर. अंतुले हे सातत्याने निवडून येत होते. त्या वेळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९९९ मध्ये काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्यात आली होती. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाशी आघाडी केली होती.२००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे बॅ. ए. आर. अंतुले शेतकरी कामगार पक्षाच्या विवेक पाटील यांचा पराभव करून निवडून आले. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची नव्याने रचना झाली आणि मावळ आणि रायगड मतदारसंघ निर्माण झाला. मावळमध्ये कर्जत, उरण आणि पनवेलमधील तीन विधानसभा मतदारसंघ तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. मावळ मतदारसंघाची पहिली निवडणूक आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि युतीतील शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यामध्ये झाली. त्यात बाबर यांनी बाजी मारली.गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे शिवसेनेतून आलेल्या राहुल नार्वेकर यांच्यामध्ये लढत झाली. यात बारणे निवडून आले. त्यांनी पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला आणि उत्तम काम करून पाचही वर्ष संसदरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, तर पराभूत झालेले नार्वेकर विधानपरिषदेचे आमदार झाले.यंदा मावळ मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. खासदार बारणे यांनी पाचही वर्ष संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, दांडगा लोकसंग्रह, निधीचे नियोजन आणि अगदी तळागाळात, दुर्गम भागात जाऊन काम करण्याचे तंत्र यामुळे हा मतदारसंघ शिवसेना सहजासहजी सोडेल की नाही? हे सांगता येत नाही.गेल्यावेळी शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवित लक्ष्मण जगताप यांनी सुमारे साडेतीन लाख मते मिळवून आपली चुणूक दाखविली होती. मात्र,यंदा शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा तगडा उमेदवार दिल्यास मतदारसंघाचे चित्र बदलेल असे वाटते. त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नावे चर्चेत आली होती. खुद्द स्मिता पाटील यांनी उमेदवारी लढणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पार्थ पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पवार आणि बारणे यांच्यामधील लढत रंगतदार होईल हे नक्की.कर्जत नगरपरिषदेमध्ये २५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून युतीने सत्ता मिळवली. माथेरान गिरीस्थान नगरपरिषदसुद्धा शिवसेनेच्या ताब्यात आह. नुकत्याच झालेल्या तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल सहा ग्रामपंचायतींचे थेट सरपंच शिवसेनेचे निवडून आले आहेत, तर उरण नगरपरिषदेवर सेनेची सत्ता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा