शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Maratha Reservation: “शिवरायांच्या राजधानीत सच्चा मावळा असं कृत्य करणार नाही; NCP कार्यालयावर दगडफेक करणारे...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:05 IST

छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्च्या मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.

ठळक मुद्दे बहुजन व मराठा समाजाबद्दल आकस असल्याने त्यांनी अनेक मराठा समाजातील नेतृत्व आपल्या बाजूला ओढून घेतले आहेलॉकडाऊनचे निर्णय पटकन घेतले जातात मग मराठा आरक्षण निर्णय सुध्दा ते घेऊ शकत होते. पण, त्यांनी ते केले नाही सर्व पुरोगामी विचारांचे समाज बांधव व इतर समाज यांच्या सहकार्याने एक ना एक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवू

सातारा - सर्वोच्च न्यायालयाने  मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय हा दुर्दैवी घटना आहे. परंतु, या पाठीमागे मोठे षडयंत्र सामान्य माणसाला दिसून येत आहे. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी  कार्यालयावर ज्यांनी सूडबुद्धीने दगडफेक केली. तो कोणत्या पक्षाशी व 'संघा'शी संलग्न आहेत, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.(MLA Shashikant Shinde Target BJP Over Broken up NCP Office in Satara by unidentified people)          

याबाबत शशिकांत शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्च्या मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आले? हा कट कुठे शिजला? याची पाळेमुळे पोलीस यंत्रणेने शोधली पाहिजेत. अशा हल्ला मराठा समाज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. म्हणून पोलीस यंत्रणेला अगोदर आम्ही जाब विचारण्यासाठी पोहचलो आहे. आपल्याला खूप मोठी शाबासकी मिळेल या भ्रमात संबंधितांनी राहू नये. आम्ही जशास तसे उत्तम प्रकारे उत्तर देऊ शकतो असा ही मार्मिक इशारा त्यांनी दिला आहे.  

मराठा आंदोलन चिघळलं; साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं, अन्...

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेतील, त्याबाबत राज्य सरकारला श्रेय किंवा दोष देता येणार नाही. असा आशय मांडला होता. सध्या आरक्षण निकालाने त्याची भूमिका ही मराठा समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणारी प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बहुजन व मराठा समाजाबद्दल आकस असल्याने त्यांनी अनेक मराठा समाजातील नेतृत्व आपल्या बाजूला ओढून घेतले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे माजी मुख्यमंत्री उभे राहिले. अनेकांच्या राजकीय महत्वकांक्षा कमी करण्यासाठी कधी इडी, सी.बी. आय, गुतचर विभाग, फोन टापिंग चे प्रकार मागे लावले, तरी तेवढी ताकद मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे लावली नाही,३७० कलम रद्द करणे, तलाक पद्धत रद्द करणे, नोटबंदी, लॉकडाऊनचे निर्णय पटकन घेतले जातात मग मराठा आरक्षण निर्णय सुध्दा ते घेऊ शकत होते. पण, त्यांनी ते केले नाही, ते झाले असते तर केंद्राने केले असे सांगून नेहमीप्रमाणे दिशाभूल केली असती असा ही आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. दरम्यान, मोडेन पण वाकणार नाही, ही जात मराठ्यांची आहे, सर्व पुरोगामी विचारांचे समाज बांधव व इतर समाज यांच्या सहकार्याने एक ना एक दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवू असा ही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSatara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShashikant Shindeशशिकांत शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस