शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

“मराठा आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली; चंद्रकांत पाटलांचे विधान हास्यास्पद अन् दुर्दैवी”

By प्रविण मरगळे | Updated: March 5, 2021 18:10 IST

Ashok Chavan Criticized BJP Chandrakant Patil over Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद आहे, केंद्र सरकारचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही असं दुर्दैवी विधान त्यांनी केले आहे

ठळक मुद्देकेंद्र सरकारचा आरक्षणाशी संबंध नसता तर सुप्रीम कोर्टाने अँटर्नी जनरलला नोटीस का दिली असती? चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद आहेदेशातील १६ राज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं आहे, त्यामुळे हा व्यापक विषय आहे

मुंबई – मराठा आरक्षणावरून विधिमंडळात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळालं, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर आरोप करत मराठ्यांना आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलंय, केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा प्रकार थांबवा असं विधान केले, त्यावरून मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी केंद्र आरक्षणाच्या प्रकरणातून पळ काढू शकत नाही असं प्रत्युत्तर दिलं आहे.(Minister Ashok Chavan Target BJP Chandrakant Patil over Maratha Reservation)

याबाबत मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद आहे, केंद्र सरकारचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही असं दुर्दैवी विधान त्यांनी केले आहे. केंद्र सरकारचा आरक्षणाशी संबंध नसता तर सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) अँटर्नी जनरलला नोटीस का दिली असती? केंद्र सरकारलाही या सुनावणीत बाजू मांडण्याची संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) आरक्षणाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, त्यात या प्रकरणातील वकिलांनी केंद्र सरकारकडून काय अपेक्षित आहे हे सांगितलं, त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही सकारात्मक उत्तर दिलं, मग ते दोन्ही वकील जे मागच्या सरकारने नियुक्त केले होते, मग त्यांचे म्हणणं चुकीचं की चंद्रकांत पाटलांचे चुकीचं आहे हे सांगावं असं चव्हाणांनी सांगितले.  

त्याचसोबत केंद्राने १०२ मध्ये घटना दुरुस्ती केली आहे, तो विषयही केंद्राशी संबंधित आहे, १०२ घटनेमुळे राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार नाहीत असं म्हटलंय, मग ही भूमिका कोणी स्पष्ट करायची? याचा खुलासा करण्याची जबाबदारी केंद्रावर आली आहे, देशातील १६ राज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं आहे, त्यामुळे हा व्यापक विषय आहे, केंद्र सरकारने याबाबतीत स्पष्ट भूमिका घेतली तर मराठासह अन्य आरक्षणावरही तोडगा निघेल, त्यामुळेच केंद्र सरकारला ही जबाबदारी घ्यावी लागेल, सर्वांच्या प्रयत्नाने आरक्षणावर मार्ग निघू शकतो, मागच्या सरकारने नियुक्त केलेले वकील आणि आताचे वकील एकच आहेत, यात राजकारण केलं जातंय असा आरोप मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटलांवर केला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?  

तामिळनाडूसह ९ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मग त्या राज्यांमध्ये आरक्षणाला स्थगिती का मिळाली नाही? पण महाविकास आघाडी सरकरामधीलच काही जणांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटत नाही. येत्या ८ ते २० मार्च दरम्यान मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून सरकारने ही न्यायालयीन लढाई नीट लढली नाही व मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.  

महाविकास आघाडी सरकार अपयशी

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण याच निर्णयात असाधारण स्थिती निर्माण झाल्यावर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत उच्च न्यायालयात युक्तिवाद करुन हा विषय नीट सप्रमाण समजावून सांगितला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळालं आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली. मात्र, हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.

माझ्यासमोर चर्चेला यावं

तामिळनाडू सरकारने स्वत: आरक्षण दिलं. तामिळनाडू सरकार केंद्राकडे गेलं नव्हतं. इतर राज्याने आपल्या ताकदीवर जसं आरक्षण दिलं आणि टिकवलं. तसंच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या ताकदीवर आरक्षण टिकवलं पाहिजे असं सांगत गायकवाड कमिशनचा अहवाल २७०० पानांचा आहे. गायकवाड आयोगाच्या अहवालाचं अजूनही मराठीत भाषांतर करण्यात आलेले नाही.  हा अहवाल कोणत्या मंत्र्याने वाचला आहे? एकाही मंत्र्याचा या अहवालावर अभ्यास नाही. मंत्र्यांनी हा अहवाल वाचला असेल तर त्यांनी माझ्यासमोर चर्चेला यावं, असं थेट आव्हानचं चंद्रकांत पाटलांनी दिलं होतं.  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAshok Chavanअशोक चव्हाणchandrakant patilचंद्रकांत पाटीलCentral Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय