शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Maratha Reservation :"मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र पाठवणार, गरज भासल्यास…” मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 21:40 IST

Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना आरक्षणासाठीच्या लढाईच्या पुढील वाटचालीबाबत मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देआता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय विश्वात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हे घटनाबाह्य ठरवत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजामध्ये निराशेचे वातावरण असून, मराठा समजामधून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना आरक्षणासाठीच्या लढाईच्या पुढील वाटचालीबाबत मोठे विधान केले आहे. ( CM Uddhav Thackeray Says "will send a letter to the Prime Minister & President for Maratha reservation")

जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र मराठा आरक्षणाबाबतची लढाई संपलेली नाही, हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठीच्या पुढील लढाईबाबतही मार्गदर्शन केले आहे. आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत मी सकाळी दिलेल्या निवेदनामधून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. मात्र आता आरक्षणाच्या या मागणीसाठी मी उद्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आहे. तसेच गरज भासल्यास आरक्षणाच्या या मुद्द्यावर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही भेट घेईन.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० हटवताना जी हिंमत दाखवली होती. तशी हिंमत आणि संवेदनशीलता मराठा आरक्षणाबाबत दाखवावी. यापूर्वीदेखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही निर्णय संसदेमधून बदलले गेले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने जास्त वेळ न घालवता मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 

दरम्यान, मराठा आरक्षणााबाबत सर्वोच्च न्यायालाने दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाजाने दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे. मी त्यासाठी मराठा समाजाचे आभार मानतो. सध्या आपण  कोरोनाच्या अत्यंत धोक्याच्या वळणावर  उभे आहोत, आतापर्यंत जो संयम आणि शांतता दाखवली, तसाच संयम दाखवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी