शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीची बैठक संपली; शिर्डी अन् पंढरपूर देवस्थान समितीचं वाटप ठरलं, एकनाथ शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 20:12 IST

सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. आघाडीतला समन्वय उत्तम सुरू आहे. आजच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत अंतिम यादी तयार करण्यात आली आहेही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल.

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन, महामंडळांवरील नियुक्त्या यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडी शिवसेनेला कमकुवत करतेय असा दावा केला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं.

सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. आघाडीतला समन्वय उत्तम सुरू आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपापला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष नाराज नाही. सरकार ५ वर्ष चालेल. बैठकीत सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच आजच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल. महामंडळाचं वाटप समसमान करण्यात आलं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यावर एकमत झालं आहे त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचं बैठकीत ठरल्याचं समजतं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करत आहे. राज्य सरकारच्या कुठल्याही निर्णयात मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांचे कामाचे विविध स्तरातून कौतुकही होत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही

तीन पक्षांमध्ये विसंवाद आहे, तीन पक्षांत एकमेकांबद्दल विश्वास नाही हे सर्व स्पष्टच आहे. पण, तिघांच्या भांडणात जनतेला का खड्ड्यात टाकताय. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, गळे मिळा. पण तुमच्या राजकारणासाठी जनतेचा बळी देणं अत्यंत चुकीचं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात हार स्विकारावी लागली. पण, या सरकारचे मंत्री स्वत:च मोर्च काढतात अन् कोर्टात बाजू मांडत नाहीत. त्यामुळे हे सरकार आहे की तमाशा अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईक