शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीची बैठक संपली; शिर्डी अन् पंढरपूर देवस्थान समितीचं वाटप ठरलं, एकनाथ शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 20:12 IST

सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. आघाडीतला समन्वय उत्तम सुरू आहे. आजच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत अंतिम यादी तयार करण्यात आली आहेही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल.

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन, महामंडळांवरील नियुक्त्या यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडी शिवसेनेला कमकुवत करतेय असा दावा केला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं.

सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. आघाडीतला समन्वय उत्तम सुरू आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपापला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष नाराज नाही. सरकार ५ वर्ष चालेल. बैठकीत सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच आजच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल. महामंडळाचं वाटप समसमान करण्यात आलं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यावर एकमत झालं आहे त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचं बैठकीत ठरल्याचं समजतं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करत आहे. राज्य सरकारच्या कुठल्याही निर्णयात मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांचे कामाचे विविध स्तरातून कौतुकही होत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही

तीन पक्षांमध्ये विसंवाद आहे, तीन पक्षांत एकमेकांबद्दल विश्वास नाही हे सर्व स्पष्टच आहे. पण, तिघांच्या भांडणात जनतेला का खड्ड्यात टाकताय. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, गळे मिळा. पण तुमच्या राजकारणासाठी जनतेचा बळी देणं अत्यंत चुकीचं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात हार स्विकारावी लागली. पण, या सरकारचे मंत्री स्वत:च मोर्च काढतात अन् कोर्टात बाजू मांडत नाहीत. त्यामुळे हे सरकार आहे की तमाशा अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईक