शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

महाविकास आघाडीची बैठक संपली; शिर्डी अन् पंढरपूर देवस्थान समितीचं वाटप ठरलं, एकनाथ शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 20:12 IST

सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. आघाडीतला समन्वय उत्तम सुरू आहे. आजच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत अंतिम यादी तयार करण्यात आली आहेही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल.

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन, महामंडळांवरील नियुक्त्या यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडी शिवसेनेला कमकुवत करतेय असा दावा केला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं.

सह्याद्री अतिथीगृहावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही. आघाडीतला समन्वय उत्तम सुरू आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपापला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष नाराज नाही. सरकार ५ वर्ष चालेल. बैठकीत सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच आजच्या बैठकीत महामंडळाच्या वाटपाबाबत अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवली जाईल. महामंडळाचं वाटप समसमान करण्यात आलं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यावर एकमत झालं आहे त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं अध्यक्षपद काँग्रेसला देण्याचं बैठकीत ठरल्याचं समजतं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य मार्गदर्शनाखाली सरकार चांगले काम करत आहे. राज्य सरकारच्या कुठल्याही निर्णयात मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांचे कामाचे विविध स्तरातून कौतुकही होत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकार आहे की तमाशा, आता शांत बसणार नाही

तीन पक्षांमध्ये विसंवाद आहे, तीन पक्षांत एकमेकांबद्दल विश्वास नाही हे सर्व स्पष्टच आहे. पण, तिघांच्या भांडणात जनतेला का खड्ड्यात टाकताय. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, गळे मिळा. पण तुमच्या राजकारणासाठी जनतेचा बळी देणं अत्यंत चुकीचं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात हार स्विकारावी लागली. पण, या सरकारचे मंत्री स्वत:च मोर्च काढतात अन् कोर्टात बाजू मांडत नाहीत. त्यामुळे हे सरकार आहे की तमाशा अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसpratap sarnaikप्रताप सरनाईक