शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

“...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते”; काँग्रेसची PM मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 15:19 IST

महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकार आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला जात आहे. महागाई, इंधनदरवाढ, पेगॅसस हेरगिरी, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या विषयांवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) जवळपास दररोज केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) माध्यामांसमोर येत नाहीत. कारण ते पत्रकार परिषद घ्यायला घाबरतात, अशी टीका यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमी महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले आहे. (maharashtra pradesh criticised pm narendra modi over not taking press conference)

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल...”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेले एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने दोन फोटो ट्विट केले असून, पहिल्या फोटोमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी पहिला फोटो राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये असे म्हटले असून, दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेमध्ये, असे म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या फोटोत काहीच दिसत नसून, केवळ ब्लॅक आऊट झालेला काळा आयताकृती फोटो पोस्ट करण्यात आला आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी पत्रकार परिषदेमध्ये आलेच नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. 

म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते

महाराष्ट्र काँग्रेसने हे ट्विट करताना #BJPFearsRahulGandhi असा हॅशटॅग वापरला आहे. पत्रकार परिषदेतील राहुल गांधी आणि कधीही पत्रकार परिषद न घेणारे मोदी अशी तुलना करत काँग्रेसने, ...म्हणूनच भाजपा राहुल गांधींना घाबरते, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून, केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि RSS वर निशाणा साधण्यात आला आहे. 

“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू”

दरम्यान, राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय, अशी विचारणा करत केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. केंद्रातील भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा