शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
2
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
3
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
4
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
5
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
6
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
7
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
8
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
9
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
10
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
11
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
12
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
13
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
14
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
15
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
16
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
17
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
18
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
19
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
20
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला सूचक इशारा: “स्वबळावर ठाम राहिलात तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:17 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवू या विधानानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादीनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ठळक मुद्देतिघांनी एकत्र राहिले पाहिजे. परंतु कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतीलपक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत करत असतीलसध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस(Congress) पक्षाने स्वबळावर आगामी निवडणुका लढवणार असल्याची भूमिका मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी राज्यात दौरा काढून वारंवार हे विधान केले आहे. पटोलेंच्या या विधानावर महाविकास आघाडीतल्या काहींनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसच्या या भूमिकेनंतर आज सामना अग्रलेखातून शिवसेनेने(Shivsena) काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र निवडणूक लढवावी लागेल असं म्हटलं आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादीनेही काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तिघांनी एकत्र राहिले पाहिजे. परंतु कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे.

पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक(Elections) लढवण्याची भाषा करत करत असतील. पण कोणत्या पक्षाचं किती बळ आहे हे राज्यातील जनतेला माहिती आहे. तिघांनी एकत्रित निवडणूक लढवणं हे फायद्याचं आहे. सध्या ते स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हणत असले तरी निवडणुका आल्यावर वेगळा विचार करू शकतात. पण तो नाहीच केला तर समविचारी पक्ष एकत्र राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तीच इच्छा आहे असं जयंत पाटील म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

राज्यातील काही पक्षांना स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. भाजपाने स्वबळाचे संकेत आधीच दिले आहेत. आता काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत. आता उरले कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही. मात्र राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला

महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती

राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे अशा शुभेच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्या असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांची यादी राज्यपालांकडे आहे. त्यावर विचार झालेला नाही. महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती परंतु यावेळी थोडासा विलंब झाला आहे मात्र आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देणं आणि दिर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करणं एवढाच माझा आणि त्यांच्या भेटीचा विषय होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोले