शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला सूचक इशारा: “स्वबळावर ठाम राहिलात तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:17 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवू या विधानानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादीनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ठळक मुद्देतिघांनी एकत्र राहिले पाहिजे. परंतु कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतीलपक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत करत असतीलसध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस(Congress) पक्षाने स्वबळावर आगामी निवडणुका लढवणार असल्याची भूमिका मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी राज्यात दौरा काढून वारंवार हे विधान केले आहे. पटोलेंच्या या विधानावर महाविकास आघाडीतल्या काहींनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांनी म्हटलं होतं.

काँग्रेसच्या या भूमिकेनंतर आज सामना अग्रलेखातून शिवसेनेने(Shivsena) काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र निवडणूक लढवावी लागेल असं म्हटलं आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवरून राष्ट्रवादीनेही काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तिघांनी एकत्र राहिले पाहिजे. परंतु कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे.

पक्ष वाढवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणूक(Elections) लढवण्याची भाषा करत करत असतील. पण कोणत्या पक्षाचं किती बळ आहे हे राज्यातील जनतेला माहिती आहे. तिघांनी एकत्रित निवडणूक लढवणं हे फायद्याचं आहे. सध्या ते स्वबळावर निवडणूक लढवायचं म्हणत असले तरी निवडणुका आल्यावर वेगळा विचार करू शकतात. पण तो नाहीच केला तर समविचारी पक्ष एकत्र राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तीच इच्छा आहे असं जयंत पाटील म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

राज्यातील काही पक्षांना स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. भाजपाने स्वबळाचे संकेत आधीच दिले आहेत. आता काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत. आता उरले कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही. मात्र राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला

महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती

राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे अशा शुभेच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्या असल्याचं जयंत पाटील म्हणाले. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज्यपाल नियुक्त १२ उमेदवारांची यादी राज्यपालांकडे आहे. त्यावर विचार झालेला नाही. महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती परंतु यावेळी थोडासा विलंब झाला आहे मात्र आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देणं आणि दिर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करणं एवढाच माझा आणि त्यांच्या भेटीचा विषय होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोले