शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
3
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
4
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
5
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
6
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
7
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
8
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
9
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
10
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
11
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
12
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
13
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
14
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
15
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
16
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
17
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
18
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
19
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
20
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी

नियमांचं पालन करणं अहंकार कसा?, राज्यपालांनी अधूनमधून गोवा सरकारचं विमानही वापरावं: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 16:26 IST

Sanjay Raut on bhagat singh koshyari: ठाकरे सरकार अहंकारीपणे वागत असल्याची टीका भाजपकडून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्या सरकारी विमान प्रवासाला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. ठाकरे सरकार अहंकारीपणे वागत असल्याची टीका भाजपकडून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आलं. सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणं, हा अहंकार आहे का?", असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Government deneid air travel to bhagat singh koshyari according to rules says sanjay raut)

नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!

राज्यपाल कोश्यारी यांना आज उत्तराखंडसाठी सरकारी विमानानं प्रवास करण्याची परवानगी राज्यसरकारच्या सामान्य विभाग प्रशासनाकडून नाकारण्यात आली. यामुळे भगतसिंह यांना ऐनवेळी विमानातून उतरावं लागलं आणि खासगी विमानाची व्यवस्था झाल्यानंतर उत्तराखंडसाठी रवाना व्हावं लागलं. या घटनेबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन केलं. "राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात. राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारलेले नाही. व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियमच आहे. उद्धव ठाकरे यांच्याजागी दुसरे कोणतेही मुख्यमंत्री असते तर त्यांनीही असंच केलं असतं. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यापाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधूनमधून गोवा सरकारचेही विमान वापरावे, थोडा भार त्यांच्यावरही टाकावा", असं संजय राऊत म्हणाले. 

"राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल": सुधीर मुनगंटीवार

महाविकास आघाडी सरकार हे आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याची टीका राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी फडणवीसांच्या विधानाची जोरदार खिल्ली उडवली. "अहंकार हा शब्द कोण कुणाला उद्देशून म्हणतंय पाहा. हे आश्चर्यच आहे. कोण-कोणास म्हणाले? असे प्रश्न आम्हाला शाळेत असायचे. या संपूर्ण प्रकरणात अहंकाराचा प्रश्न येतोच कुठे? कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकार ज्याप्रकारे वागतंय ते जर नियमात बसत असेल तर केवळ राज्यापालांना विमान नाकारणं, हा अहंकार कसा काय असू शकतो?", असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे