शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Lok Sabha Election 2019: मनसेची भूमिका उरणार का फक्त भाषणापुरती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:02 IST

महाआघाडीत स्थान नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीवरून चित्र झाले स्पष्ट

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ईशान्य मुंबई, ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील उमेदवारांचीही नावे आहेत. महाआघाडीतील वाटाघाटीदरम्यान मनसेने यापैकी एखादी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्या जागांवर राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केल्याने महाआघाडीत मनसेला स्थान नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की फक्त भाषणे करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधी मतांमधील फूट टाळावी, यासाठी मनसेला आघाडीत घ्यावे, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेटींमुळे मनसे यंदा आघाडीत सामील होणार अशीच चर्चा होती. त्यातच, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे या चर्चेला बळकटी मिळाली होती. मात्र, काँग्रेसने मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने महाआघाडीचे घोडे अडले होते. मनसे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. महाआघाडीत केवळ समविचारी पक्षांनाच स्थान असेल, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेकडून अन्य पर्यायांची चाचपणी सुरू होती. थेट महाआघाडीत समाविष्ट होता येत नसेल तर राष्ट्रवादी आणि मनसेने स्वतंत्र गणित जुळवावे. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील एखादी जागा सोडावी आणि स्वतंत्रपणे भाजपावर हल्लाबोल करावा, अशीही एक मांडणी करण्यात येत होती. मात्र, आता मनसेने दावा केलेल्या मतदारसंघांवर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्याने तीही आशा मावळल्याचे स्पष्ट झाले आहे.राज ठाकरे यांनी अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर सातत्याने टीकेची झोड उठविण्याचे धोरण स्वीकारले आहे. १३व्या वर्धापन दिनाच्या भाषणातही त्यांचा सारा रोख भाजपावरच होता. या वेळी लोकसभा निवडणुकांबाबत मात्र भाष्य करण्याचे त्यांनी टाळले होते. त्यामुळे आता मनसे आपले उमेदवार उतरविणार की फक्त भाजपावर टीकेची झोड उठवित राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.आघाडी, युतीपासून समान अंतर राखणार का?२०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपासोबत युती झालेली नसतानाही मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेला विरोध म्हणून मुंबईत तीन उमेदवारही उभे केले होते. आता आघाडीनेही राज यांना जवळ करण्याचे टाळले आहे. त्यामुळे ते उमेदवार न देताच मोदींविरोधात रान उठविणार की निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अथवा आघाडी, युतीपासून समान अंतर राखत विधानसभेच्या तयारीला लागणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस