शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

दहशतवाद्यांना भारतात कमकुवत सरकार हवंय- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 1:23 PM

सपा, बसपा, काँग्रेसवर मोदींचं शरसंधान

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील भाषणात दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. 2014 च्या आधी भारतातली परिस्थिती श्रीलंकेसारखी होती. देशात अनेक ठिकाणी बॉम्ब स्फोट व्हायचे. मात्र गेल्या पाच वर्षांत देशातली स्थिती बदलली. दहशतवादी हल्ले कमी झाले, असा दावा मोदींनी केला. ते उत्तर प्रदेशातल्या आंबेडकरनगरमध्ये जनसभेला संबोधित करत होते. आपल्या शेजारच्या देशात दहशतवादाचा कारखाना सुरू आहे. दहशतवाद्यांना आपल्या देशात कमकुवत सरकार हवं आहे. त्यामुळे तुमचं दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडेल, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीवर सडकून टीका केली. 'देशानं सपा-बसपा-काँग्रेसचा खरा चेहरा जाणून घेणं गरजेचं आहे. मायावतींनी केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला. मात्र त्यांची तत्त्वं जपली नाहीत. समाजवादी पार्टीनं राम मनोहर लोहियांनी घालून दिलेला आदर्श मातीमोल केला,' अशा शब्दात मोदी महाआघाडीवर बरसले. मोदींनी महाआघाडीसोबतच काँग्रेसवरदेखील शरसंधान साधलं. 'काँग्रेसनं सत्तर वर्षे गरिबी हटवण्याची भाषा केली. मात्र कधीही मजुरांची काळजी केली नाही. त्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचा विचार केला. आमच्या सरकारनं मजुरांना निवृत्ती वेतन, विमा अशा सुविधा दिल्या,' असं मोदी म्हणाले. जनतेचं प्रेम पाहून विरोधकांचं बीपी वाढतं, असा टोलादेखील त्यांनी लगावला. मोदी आंबेडकर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019ambedkar-nagar-pcअंबेडकर नगरNarendra Modiनरेंद्र मोदीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी