शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Lok Sabha Election 2019: पवारांचे वक्तव्य विखेंच्या जिव्हारी; नगरमध्ये प्रचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:57 AM

'हयात नसलेल्या वडिलांविषयी वक्तव्य करणे दुर्दैवी'

मुंबई : १९९१ साली बाळासाहेब विखे यांना कसे पराभूत केले होते, हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. वडील हयात नसताना त्यांच्याविषयी केले गेलेले वक्तव्य दुर्दैवी असून त्यामुळे आपण दुखावले गेलो आहोत. विखे घराण्याविषयी त्यांच्या मनात एवढा द्वेष असेल तर मी अहमदनगरमध्ये प्रचार करुन तरी काय उपयोग? असा सवाल विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.डॉ. सुजय विखे यांच्या भाजपाप्रवेशाने उठलेले राजकीय वादळ, त्यातून विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्याची झालेली मागणी, यावर राधाकृष्ण विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मुलगा सूजयने भाजपात प्रवेश केला, त्यामुळे आपण विरोधी पक्ष पदावर रहायचे की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उद्या आपण दिल्लीत त्यांना भेटायला जाणार आहोत, सगळी वस्तूस्थिती त्यांच्यासमोर मांडू. बाळासाहेब थोरात हे पक्षश्रेष्ठी नाहीत, त्यामुळे त्यांच्या विधानाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल त्यांनी मी वेळ आल्यावर बोलेन, असा इशाराही विखे यांनी दिला.काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील जागा वाटपावर चर्चा सुरु असताना पवारांनी माझ्या वडीलांविषयी काढलेल्या उद्गाराने मी व्यथीत झालो. आजोबाविषयी असे बोलणे ऐकून कदाचित सूजयने भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असेल, असेही विखे म्हणाले.तुम्ही राष्टÑवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का? असे विचारले असता ते म्हणाले, कोणी कुठे प्रचाराला जायचे यासाठी पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. ती जो निर्णय देईल त्याप्रमाणे मी प्रचाराला जाईन. अहमदनगरमध्ये मी प्रचार करणार नाही, कारण मी जरी तेथे प्रचाराला गेलो तरी माझ्यावर संशय घेतला जाईल, त्यापेक्षा मी न गेलेला बरा, असेही ते यावेळी म्हणाले.आम्ही इतिहास सांगितला - जयंत पाटीलशरद पवार यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर कोणतीही टीका केली नव्हती. याआधी नगरमधून कोण निवडून आले होते याची चर्चा सुरु असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी बाळासाहेब विखे यांचा आपण पराभव केला होता, ही जुनी आठवण सांगितली, असे स्पष्टीकरण राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.तर आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, १९९१ साली बाळासाहेब विखे हे अपक्ष उभे होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे यशवंतराव गडाख उभे होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांनीच स्वत: शरद पवार यांना कोणत्याही परिस्थीतीत काँग्रेस तेथून विजयी व्हायला हवी अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पवारांनी तेथे जोरात प्रयत्न केले व विखेंचा पराभव केला होता. जर राजीव गांधी यांचा आदेश पाळल्याचे दु:ख विखे यांना असेल तर त्यावर मी काय बोलणार?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSujay Vikheसुजय विखे