शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 14:00 IST

कोकणातील पुरपरिस्थिती संदर्भात राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधींच्या दांडीवरून भाजपचा निशाणा

ठळक मुद्देमदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच मुख्य मुद्दाराज्यपालांच्या भूमिकेचे अन्य राजकीय पक्षांनी स्वागत करायला हवे होतेकेशव उपाध्ये यांनी साधला जोरदार निशाणा

मुंबई: गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. (keshav upadhye criticize maha vikas aghadi over flood situation in maharashtra and aid to victims)

महाड येथील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही या भागाला भेट देऊन पाहणी केली. मात्र, यावेळी सर्वपक्षीय आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी दांडी मारली. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. 

“जनता राग व्यक्त करू लागल्याने शिवसेना हादरलीय, लोकहिताशी संबंध नाही, हे सिद्ध झालंय”

मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच मुख्य मुद्दा

राज्यपालांनी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे आमदार, लोकप्रतिनिधींना आपल्या दौऱ्यावेळी बोलावले होते. पूरग्रस्तांसाठीचा हा दौरा होता. जास्तीत जास्त मदत करता आली पाहिजे. केंद्राकडून मदत कशी मिळवता येईल, यासाठी दौऱ्यावर येत राज्यपालांनी चांगली भूमिका घेतली होती. कॅाग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सुनिल प्रभु आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, भाजपच्या वतीने केवळ आशिष शेलार उपस्थित राहिले. अन्य पक्षांचे नेते का आले नाहीत, हा त्यांचा विषय आहे. मात्र, त्यावरून राजकारण करायचे. राज्यपालांवर टीका करायची हे ढोंगीपणाचे आहे. पूरासारख्या अत्यंत गंभीर विषयात राजकारण न करता शक्य ती मदत केली पाहिजे. मात्र, अशा पद्धतीने चेष्टा करणे हा पूरग्रस्तांच्या वेदनांवर डागण्या देण्याचा प्रकार सुरू आहे, या शब्दांत केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. 

“CM उद्धव ठाकरे जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व, भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावी”

अन्य राजकीय पक्षांनी स्वागत करायला हवे होते

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. अधिकाधिक मदत केली पाहिजे. आणि मग राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी भूमिका घेऊन पूरग्रस्तांचे दुःख पुसायला पाहणी दौऱ्यावर जात असतील, तर अन्य राजकीय पक्षांनी त्याचे स्वागत करायला हवे होते. मात्र, बोलावून सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते तेथे गेलेच नाही. का गेले नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. परंतु, यावर राजकारण करता कामा नये, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

दरम्यान, केंद्राकडून मदत हवी आहे आणि त्यावरून राजकारणही करायचे आहे. यासाठीच अन्य कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी तिकडे फिरकले नाहीत. यामुळे पुरग्रस्तांना मदत करण्यात यांना फारशी गरज वाटत नाही. तसेच हे किती संवेदनशील आहेत हे यावरून कळतेय, अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली.  

टॅग्स :Politicsराजकारणchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAshish Shelarआशीष शेलार