शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

Maratha Reservation: “अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 15:17 IST

Maratha Reservation: भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारवर भाजपचे टीकास्त्रमराठा आरक्षण मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर साधला निशाणाकेशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून केली विचारणा

मुंबई:मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, पंढरपूरची पायी वारी यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले. तर, दुसरीकडे मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमी सोलापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे. (keshav upadhye criticised maha vikas aghadi govt over maratha reservation and pandharpur payi wari)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना पोलिसांनी अडविले. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर - पुणे महामार्ग रोखला. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही दडपशाही कशासाठी अशी विचारणा केली आहे. 

मग ही दडपशाही कशासाठी?

काल वारकऱ्यावर कारवाई आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडीसरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील?, असे सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. 

सरकार बिल्डरांना सवलती देतंय

दुसऱ्या एका ट्विटमध्ये केशव उपाध्ये यांनी राज्यात लागोपाठ झालेल्या आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्याचा मार्गावर असताना उद्धव ठाकरे सरकार काय करतय तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी ३ आत्महत्या १. प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या. २. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्नील लोणकर आत्महत्या. ३. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या मात्र राज्य सरकारची प्राथमिकता काय तर, BDD चाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव, असे टीकास्त्र उपाध्ये यांनी सोडले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणPandharpur Wariपंढरपूर वारीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार