शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: “अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 15:17 IST

Maratha Reservation: भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारवर भाजपचे टीकास्त्रमराठा आरक्षण मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर साधला निशाणाकेशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून केली विचारणा

मुंबई:मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, पंढरपूरची पायी वारी यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपही होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले. तर, दुसरीकडे मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमी सोलापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून, अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील, अशी विचारणा केली आहे. (keshav upadhye criticised maha vikas aghadi govt over maratha reservation and pandharpur payi wari)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना पोलिसांनी अडविले. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर - पुणे महामार्ग रोखला. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही दडपशाही कशासाठी अशी विचारणा केली आहे. 

मग ही दडपशाही कशासाठी?

काल वारकऱ्यावर कारवाई आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडीसरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील?, असे सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. 

सरकार बिल्डरांना सवलती देतंय

दुसऱ्या एका ट्विटमध्ये केशव उपाध्ये यांनी राज्यात लागोपाठ झालेल्या आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार हे निराशेने आत्महत्याचा मार्गावर असताना उद्धव ठाकरे सरकार काय करतय तर बिल्डरांना सवलती देत आहे. चार घटना त्यात एकाच दिवशी ३ आत्महत्या १. प्रशासनाच्या अनास्थेमुळे लोहा नांदेड येथील दिव्यांग शेतकऱ्याची आत्महत्या. २. एमपीएसीतील विलंबामुळे स्वप्नील लोणकर आत्महत्या. ३. कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांची आत्महत्या मात्र राज्य सरकारची प्राथमिकता काय तर, BDD चाळ प्रकल्प एकही वीट लावली नसताना बिल्डर्सना ५०० कोटी रूपये देण्याचा प्रस्ताव, असे टीकास्त्र उपाध्ये यांनी सोडले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणPandharpur Wariपंढरपूर वारीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकार