शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले, योगींनी UP ला आघाडीचे राज्य बनवले”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 22:19 IST

योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे.

लखनऊ: गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे उत्तर प्रदेश देशपातळीवर चर्चेत आहे. एक म्हणजे वाराणसी दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणावरून योगी सरकारचे कौतुक केले आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसने निशाणाही साधला. यानंतर, उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे. (jp nadda appreciates yogi adityanath and uttar pradesh govt) 

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपचे आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी योगी सरकारचे प्रशंसा केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही नड्डा यांनी केले. 

“PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारामुळे राज्य आघाडीवर पोहोचले आहे. देशातील तुष्टीकरण संपुष्टात आले आहे. तसेच यापूर्वीच्या सरकारमध्ये घराणेशाही वाढली होती. मात्र, योगी सरकारच्या कालावधीत घराणेशाही संपून राज्य प्रगतीपथावर पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे प्राक्तन आणि चित्र बदलवले, असे सांगत पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे विरोधकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. जनतेने विरोधकांना नाकारले आहे. आता त्यांची घरी बसायची वेळ आली आहे, असा टोला नड्डा यांनी लगावला आहे. 

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

उत्तर प्रदेशात मोठी क्षमता

उत्तर प्रदेशमध्ये मोठी क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येक बुध सशक्त आणि मजबूत करण्यावर लोकप्रतिनिधींनी भर द्यायला हवा. तसेच भाजपची संघटना पुढे नेण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे सांगताना उत्तर प्रदेश सरकार विकसित राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच डिसेंबर महिन्यापर्यंत १३३ कोटी देशवासीयांना लस देण्यात येईल, असे सांगितले जाते.

कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचे क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. मोदी आणि योगी हे सत्य विसरले असले, तरी ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे, ते कधीच विसरू शकणार नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा