शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

“उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले, योगींनी UP ला आघाडीचे राज्य बनवले”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 22:19 IST

योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे.

लखनऊ: गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे उत्तर प्रदेश देशपातळीवर चर्चेत आहे. एक म्हणजे वाराणसी दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणावरून योगी सरकारचे कौतुक केले आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसने निशाणाही साधला. यानंतर, उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी सरकारच्या कारभारामुळे उत्तर प्रदेश देशात आघाडीचे राज्य बनले आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काढले आहे. (jp nadda appreciates yogi adityanath and uttar pradesh govt) 

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपचे आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना जेपी नड्डा यांनी योगी सरकारचे प्रशंसा केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही नड्डा यांनी केले. 

“PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले

उत्तर प्रदेशमुळे देशाचे राजकारण बदलले असून, योगी आदित्यनाथ सरकारच्या कारभारामुळे राज्य आघाडीवर पोहोचले आहे. देशातील तुष्टीकरण संपुष्टात आले आहे. तसेच यापूर्वीच्या सरकारमध्ये घराणेशाही वाढली होती. मात्र, योगी सरकारच्या कालावधीत घराणेशाही संपून राज्य प्रगतीपथावर पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे प्राक्तन आणि चित्र बदलवले, असे सांगत पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे विरोधकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. जनतेने विरोधकांना नाकारले आहे. आता त्यांची घरी बसायची वेळ आली आहे, असा टोला नड्डा यांनी लगावला आहे. 

जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचा; कावड यात्रेवरुन सुप्रीम कोर्टाने योगी सरकारला फटकारले

उत्तर प्रदेशात मोठी क्षमता

उत्तर प्रदेशमध्ये मोठी क्षमता आहे. त्यामुळे प्रत्येक बुध सशक्त आणि मजबूत करण्यावर लोकप्रतिनिधींनी भर द्यायला हवा. तसेच भाजपची संघटना पुढे नेण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे सांगताना उत्तर प्रदेश सरकार विकसित राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच डिसेंबर महिन्यापर्यंत १३३ कोटी देशवासीयांना लस देण्यात येईल, असे सांगितले जाते.

कोरोना नियंत्रणात उत्तर प्रदेशची कामगिरी उल्लेखनीय; PM मोदींनी केली योगींची स्तुती

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत असताना योगी सरकारचे क्रौर्य, दुर्लक्ष आणि अव्यवस्था ही लपून राहत नाही. नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. मोदी आणि योगी हे सत्य विसरले असले, तरी ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे, ते कधीच विसरू शकणार नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा