शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

"मोदी सरकारच्या काळात झाला तब्बल १२ हजार कोटींचा लोहखनिज निर्यात घोटाळा"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2020 4:18 PM

Iron ore export scam news : केंद्रात बसलेल्या मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे दिली आहेत ज्यामुळे स्पष्ट होते की हे सरकार केवळ आपल्या काही मोजक्या मित्रांसाठी सत्तेवर आले आहे.

ठळक मुद्दे२०१४ पूर्वी लोहखनिजाची निर्यात केवळ एमएमटीसीच्या माध्यमातूनच करण्यात येत असे २०१४ मध्ये जेव्हा केंद्रात मोदी सरकार आले तेव्हा हे सर्व नियम कायदे घाई गडबडीत बदलण्यात आले२०१४ पासून आतापर्यंत अनेक खासगी कंपन्यांनीही तुकड्यांच्या माध्यमातून भारतातील लोहखनिज निर्यात करण्यास सुरुवात केली आहे

नवी दिल्ली - गेल्या सहा वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप झाला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळाता तब्बल १२ हजार कोटींचा लोहखनिज निर्यात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, केंद्रात बसलेल्या मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे दिली आहेत ज्यामुळे स्पष्ट होते की हे सरकार केवळ आपल्या काही मोजक्या मित्रांसाठी सत्तेवर आले आहे.पवन खेडा म्हणाले की, २०१४ पूर्वी लोहखनिजाची निर्यात केवळ एमएमटीसीच्या माध्यमातूनच करण्यात येत असे. एमएमटीसीसुद्धा केवळ ज्यामध्ये ६४ टक्क्यांपर्यंत लोहखनिजाचा अंश असेल त्याच लोहखनिजाची निर्यात करत असे. त्यावर लोहाचा अंश अशलेल्या खनिजाची निर्यात करण्यापूर्वी एमएमटीसीलासुद्धा सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. एमएमटीसीमध्ये ८९ टक्के भागीदारी ही सरकारची आहे. लोकखनिज निर्यात करण्यापूर्वी ३० टक्के निर्यात शुल्क आकारण्यात येत असे. उच्च प्रतिचे लोहखनिज हे देशात राहावे आणि देशातील स्टिल प्लँटसाठी त्याचा वापर करता यावा हे त्यामागचं कारण होतं.पवन खेडा यांच्या म्हणण्यानुसार २०१४ मध्ये जेव्हा केंद्रात मोदी सरकार आले तेव्हा हे सर्व नियम कायदे घाई गडबडीत बदलण्यात आले. स्टील मंत्रालयाने सर्वप्रथम ६४ टक्के लोहाचा अंश असण्याचा नियम बदलल आणि केआयओसीएलला चीन, तैवान, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये लोहखनिजाची निर्यात करण्याची परवानगी दिली. याशिवाय मंत्रालयाने आपल्या धोरणात अजून एक बदल करत लोहखनिजाच्या निर्यातीवर ३० टक्के शुल्क लागू राहील. मात्र हे लोहखनिज तुकड्यांच्या रूपात निर्यात केले तर त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्यात शुल्क लागू होणार नाही.काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सांगितले की, निर्यातीची परवानगी केआयओसीएलला मिळाली होती. मात्र २०१४ पासून आतापर्यंत अनेक खासगी कंपन्यांनीही तुकड्यांच्या माध्यमातून भारतातील लोहखनिज निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. यावरील शुल्काच्या रूपात हजारो कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे. या खासगी कंपन्यांनी २०१४ पासून आतापर्यंत ४० हजार कोटी रुपयांचे लोहखनिजनिर्यात केले आहे.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनमोल अशा नैसर्गिक संपत्तीची लूट झाली आहे. त्याशिवाय १२ हजार कोटी रुपयांचे निर्यात शुल्कसुद्धा बुडाले आहे. त्यामुळे परदेशी व्यापार कायदा १९९२ नुसार या कंपन्यांवर लोहखनिजाच्या सऱ्यांची बेकायदेशीरपणे निर्यात केल्या प्रकरणी दोन लाख कोटी रुपयांचा दंड लागू होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी केला आहे.

 

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस