शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोठी घडामोड! काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा भडका?; बाळासाहेब थोरात, नितीन राऊत पोहोचले दिल्लीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:01 IST

विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतंअधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली होती. ५ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले होते.

नवी दिल्ली – विधानसभा अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं उघड झालं आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही काळातच नाना पटोले(Nana Patole) यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून आतापर्यंत हे पद रिक्त आहे.

विधानसभा अध्यक्ष हे पद महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आले होते. परंतु नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा या पदावरून महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता. विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत चर्चा होईल मग निर्णय होईल असं राष्ट्रवादी-शिवसेना(NCP-Shivsena) म्हणत होती. तर हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. परंतु अद्याप विधानसभा अध्यक्षपदाबाबत संभ्रम आहे. 

त्यातच आता काँग्रेस(Congress) विधानसभा अध्यक्षपदावरून पक्षात मतभेद झाल्याचं कळतंय. यासाठी ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि मंत्री नितीन राऊत(Nitin Raut) दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्षपद अद्यापही काँग्रेसला मिळालं नाही. या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी थोरात, राऊत हे दिल्लीत काँग्रेस हायकमांड आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.त्याचसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

नाना पटोलेंनी केली होती घोषणा

विधानसभा अध्यक्षपदावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. विरोधकांनी ही निवडणूक नाही लढविली तर महाराष्ट्रावर उपकार होतील असं शिवसेना नेते संजय राऊतांनी म्हटलं होतं. तर ५ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस उमेदवाराची घोषणा केली जाईल असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले होते. मात्र या विधिमंडळ अधिवेशनातही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली नाही.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातNitin Rautनितीन राऊतcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा