शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 15:34 IST

इतकं होतं तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत यायचं होतं असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे.

ठळक मुद्देविरोधकांना काही काम नाही, फक्त सरकारला बदनाम करणे इतकचं काम मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी गेलेच पाहिजे हा नियम नाही, त्याची गरज नाहीकंगनाच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईवर विरोधकांचा पोटशूळ का आहे?

मुंबई - देवासारख्या नेतृत्वावर कोण टीका करत असेल तर सहन करणार नाही, रागाने मारले तर का मारलं ते बघा, अधिकाऱ्याने आपल्या मर्यादेत राहायला हवं. आमच्या नेतृत्वाचा अपमान करायचा मग त्यावर कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त केला ती गुंडगिरी कशी? कारण नसताना खंडणीसाठी मारहाण केलीय का? त्याने जे कार्टून फॉरवर्ड केले त्यावर कार्यकर्त्याचा संताप होता. अधिकाऱ्याने मर्यादा सोडली तर कार्यकर्त्यांनीही मर्यादा सोडली अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचं समर्थन केले आहे.

याबाबत अनिल परब म्हणाले की, मुन्ना यादव ज्याला माजी मुख्यमंत्री घेऊन फिरत होते, तो कोण होता? शिवसेना ज्वलंत सेना आहे. सेनेला धगधगता इतिहास आहे. सत्तेत बसलो म्हणून कुणीही टपली मारायची, खालच्या भाषेत टीका करायची, घाणेरड्या पोस्ट टाकायचा, सत्तेत बसलो म्हणून काही करायचं नाही, जो कुणी बोलेल त्याचं ऐकून घ्यायचं. हाताची घडी घालून बसायचं का? कायदेशीर कारवाई केली तर सत्तेचा दुरुपयोग केला असा आरोप करायचा आणि मारलं तर सरकारचा दुरुपयोग केला जातोय आरोप करायचं. संयम आणि मर्यादा दोन्ही बाजूने पाळायला हव्यात. टीका करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. कुणीही मर्यादा सोडली तर शिवसैनिक मर्यादा सोडणारच असं त्यांनी सांगितले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान घराच्या बाहेर कधी पडले?

मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडत नाही असा आरोप करता मग पंतप्रधान घराच्या बाहेर कधी पडले, कोणत्या राज्यात फिरले. प्रमुख पदावरील व्यक्ती अधिकाऱ्यांशी बोलत असतात. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सगळ्या जिल्ह्यातील ज्याठिकाणी पोहचता येत नाही तेथील समस्या सोडवता येतात. ज्या व्यक्तिला काम करायचं त्याने कुठूनही काम केले तरी जमतं. इतकं होतं तर मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत यायचं होतं असा टोला अनिल परब यांनी भाजपाला लगावला आहे.

तसेच राज्यातील प्रत्येक छोट्या घटकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद आहे. विरोधकांना काही काम नाही, सरकारला बदनाम करणे, सरकारवर टीका करणे एवढचं काम नाही. देशभरात पूर आला तिथे पंतप्रधान गेलेत का? विदर्भाच्या पूरात सरकारचे ४ मंत्री तळ ठोकून आहेत, त्यांच्याशी वारंवार मुख्यमंत्र्यांचा संवाद आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी गेलेच पाहिजे हा नियम नाही, त्याची गरज नाही. तिथे मदत पोहचणे हे काम सरकार करत आहे असं त्यांनी सांगितले.

कंगनाला राज्यपालांनी भेट द्यावी हे आश्चर्य

कंगनाच्या घरावर कारवाई झाली ती कायदेशीर झाली. कंगनाने अनाधिकृत बांधकाम केले ते एका दिवसात झालं नाही, याबाबत चौकशी होऊन कारवाई करु. विरोधकांचा आक्षेप असेल तर बेकायदेशीर बांधकामांचा त्यांचे समर्थन आहे की नाही हे जाहीर करावं. त्यांनी जो पोपट पाळला त्याचे पंख कोणी ओढले त्याचा विरोधकांना राग आला असावा. अनाधिकृत बांधकाम तोडल्यानंतर राज्यपालांनी कंगनाला भेट द्यावी हे आश्चर्य. महानगरपालिकेने चुकीच्या गोष्टींना समर्थन करु नये त्यांनी कारवाई करावी याला शिवसेनेचा पाठिंबा आहे. आमचं बांधकाम अनाधिकृत असेल तर कारवाई करावी, विरोधकांचीही अनेक बांधकामे आहेत सगळ्यांवर कारवाई करावी. पण कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईवर विरोधकांचा पोटशूळ का आहे? गरीब लोकांच्या बेकायदेशीर कारवाईवर महापालिका कारवाई करते तेव्हा विरोधक कधी बोलले नाही, कंगनाचं ऑफिस तुटलं तर सगळेच बोलायला पुढे आले. विरोधक फक्त राजकारण करत आहे असा आरोप अनिल परब यांनी भाजपावर केला आहे.  

ठाकरे ब्रँड कमकुवत केलं तर शिवसेना संपेल हा विरोधकांचा डाव

ठाकरे ब्रँड आधीपासून मजबूत आहे, ठाकरे ब्रँडला कधी आयुष्यात समस्या आली, सगळ्यांच्या डोळ्यात ठाकरे ब्रँडच खटकतोय, ठाकरे ब्रँड कमकुवत तर शिवसेना संपेल हा विरोधकांचा डाव आहे. ठाकरे नावाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही, ठाकरे ब्रँडच्या नावानं राज्यातील राजकारण फिरत आहे. ठाकरे ब्रँडला धक्का पोहचवण्यासाठी कुणाचीही ताकद नाही, कुवत नाही, ठाकरे ब्रँड हे फक्त नाव नाही तर आमच्यासाठी ते आदराचं विश्वासस्थान आहे असंही अनिल परब म्हणाले. 

टॅग्स :Anil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे