शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'इंदिरा गांधींना 1971च्या युद्धाचं श्रेय दिलं जातं; मग मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 11:55 IST

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचा सवाल

नवी दिल्ली: तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना 1971 च्या युद्धातल्या विजयाचं श्रेय दिलं जातं, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालाकोटचं श्रेय का देऊ नये, असा सवाल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विचारला. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मोदी करत असल्याचा आरोप काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केला. त्यावर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी जोरदार टीका केली. स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा जेव्हा शेजारी देशांसोबत युद्धं झाली, तेव्हा त्यातील विजयाचा किंवा पराभवाचा संबंध थेट तत्कालीन सरकारच्या, तेव्हाच्या पंतप्रधानांच्या कामगिरीशी जोडण्यात आला, असं सिंह म्हणाले. त्यामुळेच 1971 मध्ये भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचं श्रेय इंदिरा गांधींना दिलं जातं. बांगलादेशच्या निर्मितीबद्दल त्यांचं कौतुक होतं. तर 1962 मध्ये चीनविरुद्ध स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरलं जातं, असं सिंह यांनी म्हटलं. देशातील सर्वसामान्य जनता एअर स्ट्राइक केल्याबद्दल मोदींचं कौतुक करत आहे. देशवासीयांकडून सुरू असलेलं हे कौतुक काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कसं काय थांबवणार, असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला. भारतीय जनता संघाचे तत्कालीन इंदिरा सरकारसोबत राजकीय मतभेद होते. पण पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांनी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता, असंही सिंह यांनी म्हटलं. मात्र आता सत्तेसाठा आसुसलेला काँग्रेस पक्ष अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Indira Gandhiइंदिरा गांधीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसBJPभाजपा