शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला शिवसैनिक मत कसे देणार? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 07:00 IST

रा. स्व. संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप

मुंबई : रा. स्व. संघ ही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांनी प्रज्ञा ठाकूरला भाजपची उमेदवारी दिली. मात्र, शहीद हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वीचा शिवसेनेने निषेध का नोंदवला नाही? २००८ च्या हल्ल्यानंतर शहिदांचे छायाचित्र शिवसेनेच्या शाखेत लावले गेले. आता कुठल्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपला मते देणार याचे उत्तर सैनिकांनी द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.कुर्ला नेहरूनगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, मुंबई पोलिसांच्या धैर्यामुळे कसाब जिवंत पकडला गेला. त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी संबंध समोर आले. ज्या पोलिसांनी देशाचे रक्षण केले त्यांचा अपमान सहन करून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पोलीस, निमलष्करी दलाचा आदर करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिकावे. मुख्यमंत्री पदाची नशा चढू देऊ नका, असेही त्यांनी ठणकावले.

शिवसेनेला भाजपच्या कुबड्यांची गरज का पडली? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी खोटारड्या मोदींना घरी बसवावे, पर्याय कोण याची काळजी करू नये. देशात लोकशाही आहे त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी मोदी स्वत:च्या कुटुंबाशी कसे वागले हे पाहावे. मोदींनी अजून रॉबर्ट वड्राला तुरुंगात का टाकले नाही? याचे उत्तर द्यावे. प्रियांका गांधी वाराणसीमधून मोदींविरोधात लढण्याचे सांगून नवऱ्याची काही प्रकरणे ‘सेटल’ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.मोदी हे सर्वांत मोठे ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी आतापर्यंत ब्लॅकमेल करून राजकारण केले आहे. मोदी खोटारडे व्यक्तिमत्त्व आहे. बालाकोट हल्ल्यामध्ये एकही दहशतवादी मेला नाही, याचा खुलासा सुषमा स्वराज्य यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांचेवर्तन बालीश असून, त्यांच्या खोटारडेपणामुळे देश तोंडावर पडल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस ही भाजपची ‘ए’ टीम - आनंदराजआनंदराज आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप चुकीचा आहे. प्रत्यक्षात काँग्रेस ही भाजपची ‘ए’ टीम आहे. काँग्रेसने नेहमीच दलित मुस्लिमांची फसवणूक केली. त्यामुळे वंचित आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. या वेळी निहारिका खोंदले, अनिल कुमार, संजय भोसले, सुरेश शेट्टी, सुनील थोरात हे मुंबईतील सर्व सहा उमेदवार तसेच शुजात आंबेडकर, अशोक सोनावणे उपस्थित होते.ओवेसींची मुंबईतील प्रचाराकडे पाठवंचित बहुजन आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील प्रचाराकडे पाठ फिरवल्याने एमआयएम व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावारण आहे. भिवंडी येथील प्रचारसभेला उपस्थित राहून ओवेसी यांनी हैदराबादकडे प्रस्थान केले. आंबेडकर व ओवेसी यांची संयुक्त जाहीरसभा झाली नसल्याने कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. कुर्ल्यातील सभेला एमआयएमचा एकही महत्त्वाचा नेता उपस्थित नव्हता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019