शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'आधी मोदींच्या दौऱ्यांवरील खर्चाचा तपशील द्या; मग राज ठाकरेंच्या सभांच्या खर्चावर बोला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 16:41 IST

मनसेकडून भाजपाला जोरदार प्रत्युत्तर 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे करणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना आता मनसेनं उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या दौऱ्यांच्या खर्चाचा तपशील भाजपानं आधी जनतेला द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर अशा विविध राज्यांचा दौरा केला. याबद्दलचं स्पष्टीकरण तावडे देऊ शकतील का? अशी विचारणा किल्लेदार यांनी केली. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या विक्रमी सभांचा धसका भाजपा नेत्यांनी घेतला असून त्यांच्या भाषणाचा प्रभावानं भाजपाच्या मतांवर परिणाम होईल, या भीतीपोटी बिथरलेल्या तावडे यांनी तथ्य नसतानाही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मात्र याचा त्यांना काडीमात्र फायदा होणार नाही असं किल्लेदार यांनी सांगितलं.आतापर्यंत झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत त्यांनी कोणत्याही पक्षाचं चिन्ह, झेंडा न लावता अमूक उमेदवाराला मत द्या असं भाषण दिलेलं नाही. गेल्या ५ वर्षांच्या काळातील भाजपाची धोरणं आणि फसवेगिरी यांना बळी पडू नये, हेच आव्हान त्यांनी जागरूक नागरिकांना केलं. राज ठाकरे कोणत्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. जाहीर सभा घेऊन पंतप्रधानाबद्दल आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांना नाही का? असा सवाल किल्लेदार यांनी विचारला. विकासाच्या मुद्द्यांवर भाष्य करायचं टाळून त्यांच्या सभेच्या खर्चाचा बोलबाला करणं हा राज ठाकरे यांचा दराराच म्हणावा लागेल, असं किल्लेदार म्हणाले.    

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीVinod Tawdeविनोद तावडे