शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Farmers Protest:...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत; शेतकरी आंदोलनावरून अंतर्गत सर्व्हे

By प्रविण मरगळे | Published: February 26, 2021 2:17 PM

BJP Internal Survey on Farmers Protest: त्याचसोबत या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे हेदेखील जनतेला सांगण्यात यावं असं बैठकीत ठरलं.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावरून जो फीडबॅक मिळत आहे तो भाजपासाठी चांगला नाहीजर शेतकरी आंदोलन यापुढेही आणखी काही काळ चाललं तर आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत फटकाशेतकऱ्यांचे आंदोलन खूप काळ चालले तर जाट आणि मुस्लीम मतदार एकत्र येण्याचीही शक्यता

नवी दिल्ली - मागील काही महिन्यापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचाभाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन कृषी कायद्याच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाबाबत एक अहवाल दिला आहे. ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.(BJP Internal Survey on Farmers Protest) 

अलीकडेच जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील जवळपास ४० जाट बहुल लोकसभा मतदारसंघातील खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती, या बैठकीत खासदारांनी सर्वसामान्य जनतेत जाऊन कृषी कायद्याविरोधात असलेला गैरसमज दूर करावा आणि कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतोय हे सांगण्याची जबाबदारी देण्यात आली, त्याचसोबत या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे हेदेखील जनतेला सांगण्यात यावं असं बैठकीत ठरलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलनावरून जो फीडबॅक मिळत आहे तो भाजपासाठी चांगला नाही, पश्चिम उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने फीडबॅक येतोय त्यानुसार जर शेतकरी आंदोलन यापुढेही आणखी काही काळ चाललं तर आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जाट मतदार हा भाजपापासून दुरावला जाऊ शकतो. लवकरात लवकर हे शेतकरी आंदोलन संपावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे, त्यासाठी सरकारला शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या समस्येवर तोडगा काढणं गरजेचे आहे.

हरियाणात जाट समुदायाच्या नाराजीचं कारण हरियाणातील नेतृत्व आहे, कृषी विधेयकाच्या माध्यमातून ही नाराजी आणखी वाढलीआहे, यूपीच्या पश्चिम भागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ केली नाही, म्हणून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, त्याशिवाय अद्यापही ऊस उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले नाहीत. माहितीनुसार, शेतकरी आंदोलनामुळे सरकारविरोधात शेतकऱ्यांमधील रोष वाढत चालला आहे, पश्चिम यूपीत ३६ खाप पंचायती आहेत, या खाप पंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते.

...तर जाट अन् मुस्लीम एकत्र येतील

शेतकऱ्यांचे आंदोलन खूप काळ चालले तर जाट आणि मुस्लीम मतदार एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मग त्याचा परिणाम फक्त पश्चिम उत्तर प्रदेशात नव्हे तर अनेक भागात त्याचा फटका बसू शकतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाऊन कृषी कायदे शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत हे पक्षाला सांगावं लागेल. याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागेल, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळेही सर्वसामान्य जनतेत सरकारविरोधात नाराजी वाढत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाAmit Shahअमित शहाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाUttar Pradeshउत्तर प्रदेश