शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest:...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत; शेतकरी आंदोलनावरून अंतर्गत सर्व्हे

By प्रविण मरगळे | Updated: February 26, 2021 14:19 IST

BJP Internal Survey on Farmers Protest: त्याचसोबत या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे हेदेखील जनतेला सांगण्यात यावं असं बैठकीत ठरलं.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावरून जो फीडबॅक मिळत आहे तो भाजपासाठी चांगला नाहीजर शेतकरी आंदोलन यापुढेही आणखी काही काळ चाललं तर आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत फटकाशेतकऱ्यांचे आंदोलन खूप काळ चालले तर जाट आणि मुस्लीम मतदार एकत्र येण्याचीही शक्यता

नवी दिल्ली - मागील काही महिन्यापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचाभाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन कृषी कायद्याच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाबाबत एक अहवाल दिला आहे. ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.(BJP Internal Survey on Farmers Protest) 

अलीकडेच जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील जवळपास ४० जाट बहुल लोकसभा मतदारसंघातील खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती, या बैठकीत खासदारांनी सर्वसामान्य जनतेत जाऊन कृषी कायद्याविरोधात असलेला गैरसमज दूर करावा आणि कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतोय हे सांगण्याची जबाबदारी देण्यात आली, त्याचसोबत या आंदोलनाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे हेदेखील जनतेला सांगण्यात यावं असं बैठकीत ठरलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलनावरून जो फीडबॅक मिळत आहे तो भाजपासाठी चांगला नाही, पश्चिम उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने फीडबॅक येतोय त्यानुसार जर शेतकरी आंदोलन यापुढेही आणखी काही काळ चाललं तर आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जाट मतदार हा भाजपापासून दुरावला जाऊ शकतो. लवकरात लवकर हे शेतकरी आंदोलन संपावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे, त्यासाठी सरकारला शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या समस्येवर तोडगा काढणं गरजेचे आहे.

हरियाणात जाट समुदायाच्या नाराजीचं कारण हरियाणातील नेतृत्व आहे, कृषी विधेयकाच्या माध्यमातून ही नाराजी आणखी वाढलीआहे, यूपीच्या पश्चिम भागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ केली नाही, म्हणून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, त्याशिवाय अद्यापही ऊस उत्पादकांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळाले नाहीत. माहितीनुसार, शेतकरी आंदोलनामुळे सरकारविरोधात शेतकऱ्यांमधील रोष वाढत चालला आहे, पश्चिम यूपीत ३६ खाप पंचायती आहेत, या खाप पंचायतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते.

...तर जाट अन् मुस्लीम एकत्र येतील

शेतकऱ्यांचे आंदोलन खूप काळ चालले तर जाट आणि मुस्लीम मतदार एकत्र येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मग त्याचा परिणाम फक्त पश्चिम उत्तर प्रदेशात नव्हे तर अनेक भागात त्याचा फटका बसू शकतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाऊन कृषी कायदे शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत हे पक्षाला सांगावं लागेल. याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करावा लागेल, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळेही सर्वसामान्य जनतेत सरकारविरोधात नाराजी वाढत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाAmit Shahअमित शहाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाUttar Pradeshउत्तर प्रदेश