शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 11:54 IST

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.  राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात आणि त्यांना तसेच अशोक यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही असं राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आठ तारखेला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या भारत बंदचे समर्थन केलं आहे. मात्र यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे पूनिया म्हणाले. जगात खुल्या मनाने, खुला भारत नवा भारत आणि प्रगतीच्या मार्गावर चालावा यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी हे शेतकऱ्यांचे समर्थक असल्याचं म्हटलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केल्याचं विधान गेहलोत यांनी केलं आहे."

"गेहलोत यांचे हे विधान निराधार आहे. राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाईम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही" असं भाजपाच्या सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे. तसेच राजस्थानात शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी असं देखील म्हटलं आहे. 

"काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी"

राजस्थानातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार या प्रश्नाचं उत्तरही अशोक गेहलोत देत नाहीत. जर ते खरोखरच शेतकऱ्यांचे हितचिंतक असतील, तर त्यांनी राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घेतली पाहिजे पूनिया यांनी म्हटलं आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी किमान समर्थन मूल्य कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे सांगत असताना मंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "आंदोलन करणारे शेतकरी हे खरे शेतकरी असल्याचं आपल्याला वाटत नाही. शेतात काम करणारे खरे शेतकरी याबाबत चिंतेत आहेत असं आपल्याला वाटत नाही" असं कैलाश चौधरी यांनी म्हटलं आहे.

"आंदोलन करणारे शेतकरी हे खरे वाटत नाहीत", कृषी राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. देशातील शेतकऱ्यांचा नव्या कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचं देखील चौधरी यांनी म्हटलं आहे. "मला वाटतं की राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि शेतकऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. देशात अशांतता पसरेल असा कोणताही निर्णय शेतकरी घेणार नाहीत, यावर माझा ठाम विश्वास आहे. या कायद्यांमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. जे खरे शेतकरी आहेत, ते आपल्या शेतात काम करत आहेत आणि मला नाही वाचत की ते दु:खी आहेत" असं चौधरी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरी