शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

“म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती”; फडणवीसांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 9:12 PM

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तरयापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे - फडणवीसमला माहिती आहे की, संन्यास घ्यायची गरजच येणार नाही - फडणवीस

मुंबई: ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण यावरून राज्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तर, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरदार झडत आहेत. दोन्ही आरक्षणांच्या मुद्द्यावरून भाजपने सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात बोलताना संन्यास घेण्याची भाषा केली होती. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर, म्हणूनच संन्यास घेण्याची भाषा केली होती, असा प्रतिटोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis replied sanjay raut over retirement statement)

राज्यात सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. गरज पडली, तर मी त्यांची भेट घेईन. राज्याला आणि देशाला त्यांची गरज आहे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. याला आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

“हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार

ज्यावेळी एखादी गोष्ट बोलतो, तेव्हा विचारपूर्वकच बोलतो. मला माहिती आहे की, संन्यास घ्यायची गरजच येणार नाही. पण जे करण्यासारखे आहे ते हे करत नाहीत. म्हणून मी तसे बोललो आणि राऊत म्हणतात तेही खरेच आहे, राज्याच्या राजकारणाला सगळ्यांचीच गरज आहे. माझीही गरज आहे, त्यांचीही गरज आहे. राजकारण एका पक्षाचे नसते. राजकारणात विरोधकही पाहिजेत. सगळ्याच प्रकारच्या लोकांची गरज आहे यापुढेही २५ वर्ष राजकारण करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

दरम्यान, संजय राऊत एक असे व्यक्ती आहेत, जे सकाळी काही सांगतात, दुपारी काही सांगतात, संध्याकाळी अजून काही सांगतात आणि दुसऱ्या दिवशी तिसरेच काहीतरी सांगतात. त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही आपले मत बनवायला लागलो आणि तुम्हीही बातमी बनवायला लागलात, तर तुमची बातमी योग्य होणार नाही, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना काढला. 

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा