शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 11:08 IST

Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहेउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेलकोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावे

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या फैलावामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India)दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. (Sanjay Raut Criticize Central Government) कोरोनाकाळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र कोरोनाकाळात सर्वोतम काम महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Shiv Sena Leader Sanjay Raut Says,"The best work in Maharashtra during the Coronavir era, there were many attempts to discredit but..")

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकंदरीत परिस्थिती पाहता देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावे लागेल. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहे. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेल. 

कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, देशातील आजची परिस्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे, चर्चेमध्ये कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. ही परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आले पाहिजे. 

 दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीच्या जाणवत असलेल्या तुटवड्याबाबत भाष्य करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे मागणी केली असेल तर केंद्राने तिची पूर्तता केली पाहिजे, असे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधिकांचा आकडा बऱ्यापैकी स्थिरावला आहे. काल राज्यात कोरोनाच्या ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ६१ हजार १८१ जणांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात सध्या कोरोनाचे ६ लाख ७३ हजार ४८१ अॅक्टिव रुग्ण आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी