शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 11:08 IST

Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहेउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेलकोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावे

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या फैलावामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India)दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. (Sanjay Raut Criticize Central Government) कोरोनाकाळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र कोरोनाकाळात सर्वोतम काम महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Shiv Sena Leader Sanjay Raut Says,"The best work in Maharashtra during the Coronavir era, there were many attempts to discredit but..")

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकंदरीत परिस्थिती पाहता देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावे लागेल. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहे. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेल. 

कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, देशातील आजची परिस्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे, चर्चेमध्ये कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. ही परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आले पाहिजे. 

 दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीच्या जाणवत असलेल्या तुटवड्याबाबत भाष्य करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे मागणी केली असेल तर केंद्राने तिची पूर्तता केली पाहिजे, असे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधिकांचा आकडा बऱ्यापैकी स्थिरावला आहे. काल राज्यात कोरोनाच्या ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ६१ हजार १८१ जणांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात सध्या कोरोनाचे ६ लाख ७३ हजार ४८१ अॅक्टिव रुग्ण आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी