शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसचं नाराजी नाट्य; अजित पवारांचा फोन जाताच उपोषण रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:41 AM

अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती.

अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेस आमदारांच्या कार्यक्षेत्रातील नगरपालिकांना निधी देण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत, काँग्रेसच्या ११ आमदारांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करताच आ. कैलास गोरंट्याल यांनी आपले उपोषण मागे घेतले.

विकास निधीच्या माध्यमातून काँग्रेस दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. जर राष्ट्रवादीकडून अशा पद्धतीने काँग्रेसच्या आमदारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले तर, हा दबाव गट कामाला येईल, असा प्रयत्न यामागे असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. विविध मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी २५/१५ या नियमाखाली निधी दिला जातो. या निधीचे वाटप करताना राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देण्यात आले. नगर विकास विभागाकडून देण्यात येणाऱ्या निधीमध्ये देखील शिवसेनेच्या आमदारांना झुकते माप दिले गेले. काँग्रेसचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत तिथल्या नगरपालिकांना पुरेसा निधी मिळाला नाही.

अनेक ठिकाणी निधी वाटप करत असताना ज्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य जास्त आहेत, त्यांना झुकते माप दिले गेले. यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. हा विषय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातला होता. थोरात म्हणाले, ठाकरे आणि अजित पवार दोघांशीही बोललो आहे.मधल्या काळात काही निधी कमी दिला गेला, पण पुरवणी मागण्यांमध्ये सगळ््यांना व्यवस्थित निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आमदारांची नाराजी असणे समजू शकतो, कारण प्रत्येकाला आपल्या मतदारसंघासाठी विकास कामांकरता निधीला पाहिजे असतो. मात्र लगेच सरकारवर संकट आले, असा त्याचा अर्थ काढणे योग्य नाही, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

उर्वरित दहा आमदार कोण आहेत असे विचारले असता आमदार गोरंट्याल म्हणाले, त्यांची नावे घेणे योग्य नाही. दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रात या अनुषंगाने खासदार निधी गोठण्याचा मुद्दा पुढे आणण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार उपोषण करत आहेत, लोकशाही वगैरे मान्य आहे, मात्र ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावर अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल, असा नाराजीचा सूरही लावला आहे.नाईलाजाने उपोषणाचा मार्ग निवडलाआ. कैलास गोरंट्याल म्हणाले, माझ्या मतदारसंघात नगरपालिकेसाठी नगर विकास विभागाने निधी दिला नाही. माझ्यासोबत आणखी दहा आमदार असे आहेत, ज्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळेच आम्ही नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: आपल्याला फोन केला आणि निधी देतो, पुरवणी मागण्यांत व्यवस्था करतो, असे सांगितले. आम्ही उपोषण करणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस