शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 10:06 IST

Maha Vikas Aghadi Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मित्रपक्षांबद्दल महत्त्वाचे भाष्य केले. 

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण, यावेळी पुन्हा महाविकास आघाडीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाभोवती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "एका दिवसासाठी का होईना, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे." 

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? याबद्दल वेगवेगळे आडाखे मांडले जात आहेत. याबद्दल एका मुलाखतीत अंबादास दानवे यांनी भाष्य केले. 

"भाजपासोबत असतो तरीही मंत्रिपदे मिळाली असती"

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नको, असं वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, "असं नाही. उलट त्यांनी मिळूनच उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं होतं. आम्ही शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर बसायला मिळाले."

शंभर टक्के उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील -दानवे

"शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेवर बसायला भेटले. काँग्रेस तीन नंबर होती. हेही लक्षात ठेवले पाहिजे. पण, उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली म्हणून यांच्या वाट्याला मंत्रि‍पदे आली. तसे तर आम्हाला त्यांच्याकडूनही (भाजपा) मंत्रि‍पदे मिळाली असती ना? भाजपाबरोबर राहिलो असतो, तर...", असा उलट सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला. "यावेळीही शंभर टक्केच उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री असतील", असेही अंबादास दानवे म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे