शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 11:14 IST

Lok Sabha: विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे.

ठळक मुद्देलोकसभेत खासदारांची संख्या १ हजारवर जाणार?केंद्रातील मोदी सरकारचा प्रस्तावकाँग्रेस नेते मनिष तिवारी यांचा मोठा दावा

नवी दिल्ली:संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिला आठवडा पॅगेसस हेरगिरी प्रकरण आणि इंधनदरवाढ तसेच महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून चांगलाच गाजला. अनेकदा दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता लोकसभेत खासदारांचे संख्याबळ एक हजारांवर नेण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली असून, तसा उल्लेख एका प्रस्तावात करण्यात आल्याचा मोठा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp)

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सदर दावा केला आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी खासदारांचे संख्याबळ वाढवत १ हजार किंवा त्यापेक्षा जास्त असावे, असा उल्लेख केंद्र सरकारच्या प्रस्तावात असल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

नवीन संसदेत १ हजार जणांची आसनव्यवस्था

संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी, सन २०२४ पूर्वी लोकसभेचे संख्याबळ १ हजार किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसद भवन १ हजार जण बसू शकतील, अशा पद्धतीने बांधले जात आहे. पण हे करण्याआधी यावर गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे. ती सार्वजनिक असावी, असे ट्विट मनिष तिवारी यांनी केले आहे. 

हे मान्य नाही

मनिष तिवारी यांच्या ट्विटवर काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात सार्वजनिक वाद-विवाद होणे आवश्यक आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात लोकांमधून निवडून येणाऱ्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. पण ही वाढ जर लोकसंख्येच्या आधार होत असेल तर दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल आणि हे मान्य नाही, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

दरम्यान, आताच्या घडीला लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. संसदेची नवी इमारत उभारली जात असून, सरकारने लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याचं संकेत सरकारने दिली आहे. लोकसभा संपूर्ण देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असून भविष्यात खासदारांची संख्या वाढवली जाऊ शकते, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण