शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 11:14 IST

Lok Sabha: विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे.

ठळक मुद्देलोकसभेत खासदारांची संख्या १ हजारवर जाणार?केंद्रातील मोदी सरकारचा प्रस्तावकाँग्रेस नेते मनिष तिवारी यांचा मोठा दावा

नवी दिल्ली:संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिला आठवडा पॅगेसस हेरगिरी प्रकरण आणि इंधनदरवाढ तसेच महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून चांगलाच गाजला. अनेकदा दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता लोकसभेत खासदारांचे संख्याबळ एक हजारांवर नेण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली असून, तसा उल्लेख एका प्रस्तावात करण्यात आल्याचा मोठा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp)

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सदर दावा केला आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी खासदारांचे संख्याबळ वाढवत १ हजार किंवा त्यापेक्षा जास्त असावे, असा उल्लेख केंद्र सरकारच्या प्रस्तावात असल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

नवीन संसदेत १ हजार जणांची आसनव्यवस्था

संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी, सन २०२४ पूर्वी लोकसभेचे संख्याबळ १ हजार किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसद भवन १ हजार जण बसू शकतील, अशा पद्धतीने बांधले जात आहे. पण हे करण्याआधी यावर गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे. ती सार्वजनिक असावी, असे ट्विट मनिष तिवारी यांनी केले आहे. 

हे मान्य नाही

मनिष तिवारी यांच्या ट्विटवर काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात सार्वजनिक वाद-विवाद होणे आवश्यक आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात लोकांमधून निवडून येणाऱ्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. पण ही वाढ जर लोकसंख्येच्या आधार होत असेल तर दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल आणि हे मान्य नाही, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

दरम्यान, आताच्या घडीला लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. संसदेची नवी इमारत उभारली जात असून, सरकारने लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याचं संकेत सरकारने दिली आहे. लोकसभा संपूर्ण देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असून भविष्यात खासदारांची संख्या वाढवली जाऊ शकते, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण