शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

"शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत"; थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 12:37 IST

Congress : आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत असल्याचंही विश्वबंधू राय यांनी पत्रात नमूद केलं आहे.

ठळक मुद्देवर्षभरात काय गमावलं काय मिळवलं या विषयावर सोनिया गांधींना मुंबई काँग्रेस महासचिवांचं पत्रसरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसत असल्याचाही पत्राद्वारे आरोप

राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरूपम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्रात राज्यात काँग्रेसला बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस पक्षानं काय मिळवलं आणि काय गमावलं असं म्हणत त्यांनी काही मुद्दे या पत्राद्वारे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या एका वर्षात काँग्रेस पक्ष सरकारमध्ये एक सहयोगी पक्ष म्हणूनच राहिला आहे. महाराष्ट्रात सरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विश्वबंधू राय यांनी केला आहे.महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेस पक्षातील अनेक मंत्री संघटनेच्या कोणत्याही कामासाठी मदतीस येत नाही. सामान्य जनता आणि पक्षा कार्यकर्त्यांना मंत्र्यांच्या विभागाबद्दलही माहिती नाही. महाराष्ट्रात सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी राज्यातील अनेक विभाग, मंडळं आणि आयोगांवरील पद रिक्त आहेत. त्यावर आतापर्यंत नियुक्ती करण्यात आलेली नाही. आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत आहोत, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस पक्षाद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनांवर कोणतंही काम केलं जात नाही. सर्व आश्वासनं तशीच राहिली असून आता एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. आपली मतं आपले सहकारी पक्ष आणि विरोधी पक्षा त्यांच्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. पक्षातून अन्य पक्षात होणारे प्रवेश थांबवण्यासाठीही काही पावलं उचलणं आवश्यक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आघाडीच्या नियमांवर चालण्याच्या सूचना देणं आवश्यक असल्याचं विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र