शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

"शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत"; थेट सोनिया गांधींनाच पाठवलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 12:37 IST

Congress : आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत असल्याचंही विश्वबंधू राय यांनी पत्रात नमूद केलं आहे.

ठळक मुद्देवर्षभरात काय गमावलं काय मिळवलं या विषयावर सोनिया गांधींना मुंबई काँग्रेस महासचिवांचं पत्रसरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसत असल्याचाही पत्राद्वारे आरोप

राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मुंबई काँग्रेसचे महासचिव आणि माजी खासदार संजय निरूपम यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधू राय यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्रात राज्यात काँग्रेसला बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस पक्षानं काय मिळवलं आणि काय गमावलं असं म्हणत त्यांनी काही मुद्दे या पत्राद्वारे सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या एका वर्षात काँग्रेस पक्ष सरकारमध्ये एक सहयोगी पक्ष म्हणूनच राहिला आहे. महाराष्ट्रात सरकार चालवण्याच्या भूमिकेत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप विश्वबंधू राय यांनी केला आहे.महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेस पक्षातील अनेक मंत्री संघटनेच्या कोणत्याही कामासाठी मदतीस येत नाही. सामान्य जनता आणि पक्षा कार्यकर्त्यांना मंत्र्यांच्या विभागाबद्दलही माहिती नाही. महाराष्ट्रात सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी राज्यातील अनेक विभाग, मंडळं आणि आयोगांवरील पद रिक्त आहेत. त्यावर आतापर्यंत नियुक्ती करण्यात आलेली नाही. आपले सहकारी पक्ष रणनीती आखून आपल्या पक्षाला नुकसान पोहोचवत असून स्वत:चा पक्ष पुढे नेण्याचं काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी आपण अपयशी ठरत आहोत, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस पक्षाद्वारे देण्यात आलेल्या आश्वासनांवर कोणतंही काम केलं जात नाही. सर्व आश्वासनं तशीच राहिली असून आता एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण झाला आहे. आपली मतं आपले सहकारी पक्ष आणि विरोधी पक्षा त्यांच्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहेत. पक्षातून अन्य पक्षात होणारे प्रवेश थांबवण्यासाठीही काही पावलं उचलणं आवश्यक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आघाडीच्या नियमांवर चालण्याच्या सूचना देणं आवश्यक असल्याचं विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र