शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

काँग्रेसने ठेवली होती जेम्स बाँडप्रमाणे इतरांवर पाळत, मुख्तार अब्बास नक्वी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 8:36 AM

politics News: पेगासससारख्या धादांत खोट्या प्रकरणावरून काँग्रेस गोंधळ माजवून संसदेचा वेळ वाया घालवत आहे, असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेत होती, त्यावेळी जेम्स बाँडप्रमाणे इतरांवर पाळत ठेवत होती. आता पेगासससारख्या धादांत खोट्या प्रकरणावरून काँग्रेस गोंधळ माजवून संसदेचा वेळ वाया घालवत आहे, असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.नक्वी म्हणाले की, संसदेत कोणत्या विषयांवर चर्चा करायची याची कार्यक्रम पत्रिका ठरलेली आहे. धादांत खोट्या विषयांवर संसदेत चर्चा करण्याची काहीही आवश्यकता नाही. कोरोना स्थिती, शेतकऱ्यांबाबतच्या चर्चेबद्दलही विरोधकांनी धरसोडीचे धोरण स्वीकारले. देशात विविध ठिकाणी पूर आला आहे. त्याबाबत तसेच महागाईबद्दल संसदेत चर्चा व्हावी, असे विरोधकांना वाटत नाही. पेगासस प्रकरणाबाबत केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत निवेदन केले होते. 

पितळ उघडे पडलेकेंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, राफेल विमाने खरेदी प्रकरणावरूनही काँग्रेसने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आताही हा पक्ष संसदेचा वेळ वाया घालवत आहे. मात्र, प्रत्येक वेळी काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. यूपीए सरकारच्या कारकीर्दीत त्यांच्याच वित्तमंत्र्यांवर पाळत ठेवली जात होती. तसा आरोप या मंत्र्यांनी केला होता याची आठवणही नक्वी यांनी करून दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस