शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 12:48 IST

Shiv Sena MP Vinayak Raut : सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही, असे विनायक राऊत म्हटले आहे.

ठळक मुद्दे'संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही'

रत्नागिरी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case) सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच, याप्रकरणी कथित आरोप असणारे ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन केले. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाष्य केले आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते, असे सांगत याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे विनायक राऊत म्हटले आहे. (Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter)

गुरुवारी विनायक राऊत यांनी 'TV9 मराठी' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. पोहारादेवी येथी झालेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत की नाही, हे मला माहीत नाही. सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही. तसेच, या प्रकरणावरुन राज्यातील महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. मात्र, जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही. या प्रकरणाची निपक्ष:पातीपणे चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, या प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

संजय राठोड यांनी काल घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!संजय राठोड यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु त्यांना भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ दोनच मिनिटं संजय राठोड यांच्याशी संवाद साधला. संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVinayak Rautविनायक राऊत Sanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा