शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
5
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
6
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
7
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
8
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
9
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
10
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
11
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
12
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
13
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
14
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
15
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
16
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
17
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
18
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
19
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!

"जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 12:48 IST

Shiv Sena MP Vinayak Raut : सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही, असे विनायक राऊत म्हटले आहे.

ठळक मुद्दे'संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही'

रत्नागिरी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case) सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यातच, याप्रकरणी कथित आरोप असणारे ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन केले. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाष्य केले आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे गर्दी जमवून केलेले शक्तीप्रदर्शन अयोग्य होते, असे सांगत याप्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर दोषींवर नक्की कारवाई होईल, असे विनायक राऊत म्हटले आहे. (Shiv Sena MP Vinayak Raut on Sanjay Rathod Poharadevi matter)

गुरुवारी विनायक राऊत यांनी 'TV9 मराठी' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करणे योग्य ठरणार नाही. पोहारादेवी येथी झालेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत की नाही, हे मला माहीत नाही. सर्वांना समान न्याय, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. त्यामुळे पोहरादेवी प्रकरणात कोणीही सुटणार नाही. तसेच, या प्रकरणावरुन राज्यातील महाविकासआघाडीत कोणतीही खदखद नाही. मात्र, जो कोणी चुकला असेल त्याला मुख्यमंत्री क्षमा करणार नाहीत, असे विनायक राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, संजय राठोड प्रकरणात भाजपाने केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपाकडे आरोप करण्यापलीकडे दुसरे काहीच उरले नाही. या प्रकरणाची निपक्ष:पातीपणे चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, या प्रकरणात आरोप करणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे, असेही विनायक राऊत यांनी सांगितले.

संजय राठोड यांनी काल घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!संजय राठोड यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. परंतु त्यांना भेटीसाठी दीड तास ताटकळत राहावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ दोनच मिनिटं संजय राठोड यांच्याशी संवाद साधला. संजय राठोड वर्षा बंगल्यावर गेले त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे संजय राठोड यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते, ऊर्जामंत्री नितीन राऊतदेखील वर्षा बंगल्यावर पोहोचले. संजय राठोड आणि त्यांच्यात काही चर्चा झाली का, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVinayak Rautविनायक राऊत Sanjay Rathodसंजय राठोडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा