शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 22:55 IST

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं.

ठळक मुद्देबाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मी निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कुठेही अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला नव्हताम्हाडा सदनिका टाटा रुग्णालयाता सुपूर्द करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती.

मुंबई – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम घेतला होता. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. मात्र आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तपासून अहवाल सादर करा, तोपर्यंत निर्णयाला स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारला आहे. या निर्णयाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी जो निर्णय घेतला होता तो उदात्त भावनेतून घेतला होता. बाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मी निर्णय घेतला होता. त्यात माझा कुठलाही हेतू नव्हता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कुठेही अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री हे आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेतला जात नाही. म्हाडा सदनिका टाटा रुग्णालयाता सुपूर्द करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. मात्र यात काही गैरसमज झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते टीव्ही ९ शी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना कुठला संशय आहे का?

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडानं १०० सदनिका दिल्या, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा त्याचं कौतुक केले होते. परंतु या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी संवेदनशीलपणे विचार करायला हवा होता. निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

आमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय?

शिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjay Chaudharyअजय चौधरीShiv SenaशिवसेनाPraveen Darekarप्रवीण दरेकर