शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 22:55 IST

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं.

ठळक मुद्देबाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मी निर्णय घेतला होता. या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कुठेही अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला नव्हताम्हाडा सदनिका टाटा रुग्णालयाता सुपूर्द करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती.

मुंबई – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम घेतला होता. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. मात्र आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तपासून अहवाल सादर करा, तोपर्यंत निर्णयाला स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारला आहे. या निर्णयाबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी जो निर्णय घेतला होता तो उदात्त भावनेतून घेतला होता. बाहेर गावावरून येणाऱ्या कॅन्सर रुग्णाच्या नातेवाईकांची सोय व्हावी यासाठी मी निर्णय घेतला होता. त्यात माझा कुठलाही हेतू नव्हता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्दैवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना कुठेही अंधारात ठेऊन निर्णय घेण्यात आला नव्हता असंही त्यांनी म्हटलं आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री हे आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेतला जात नाही. म्हाडा सदनिका टाटा रुग्णालयाता सुपूर्द करतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. मात्र यात काही गैरसमज झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते टीव्ही ९ शी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना कुठला संशय आहे का?

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडानं १०० सदनिका दिल्या, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा त्याचं कौतुक केले होते. परंतु या निर्णयाला स्थगिती देण्यापूर्वी संवेदनशीलपणे विचार करायला हवा होता. निर्णय झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? या निर्णयाला स्थगिती देण्यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा होणं गरजेचे आहे. शिवसेना आमदाराचं पत्र वाचून या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठे संशय आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

आमदार अजय चौधरी यांच्यात पत्रात काय म्हटलंय?

शिवडी विधानसभा मतदारसंघातील सुखकर्ता आणि विघ्नहर्ता सोसायटी या पुर्नरचित इमारतींमध्ये ७५० मराठी कुटुंब राहतात. सदर इमारती पुर्नविकसित करण्यात येत असल्याने म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिका रहिवाशी व संक्रमण शिबिरातील रहिवाशी यांना कायम स्वरुपी राहण्याकरिता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरीत न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरिता टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला. त्यामुळे या कुटुंबाने चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjay Chaudharyअजय चौधरीShiv SenaशिवसेनाPraveen Darekarप्रवीण दरेकर