शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

काँग्रेस आमदार उपोषणाला बसणार असतील तर...; मित्रपक्षाच्या नाराजीवर शिवसेनेचं सूचक भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 07:48 IST

विकास निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे आमदार नाराज

मुंबई: पुरेसा विकास निधी मिळत नसल्यानं काँग्रेसचे ११ आमदार नाराज असून ते लवकरच उपोषणाला बसणार आहेत. काँग्रेस आमदारांच्या नाराजीवर शिवसेनेनं 'सामना'मधून सूचक भाष्य केलं आहे. आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँगेसचा प्रश्न. विरोधकांना हाती आयते कोलीत मिळेल व काँगेस नेतृत्वासमोरील अडचण वाढेल ती वेगळीच, अशा शब्दांत शिवसेनेनं सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान केलं आहे.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. आघाडीचे सरकार चालवणे ही एक कला आहे. त्यात ही नुसती आघाडी नसून महाविकास आघाडी आहे. त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. काँगेसच्या 11 आमदारांनी आता उपोषणास बसायचे ठरवले आहे. विकास निधीचे समान वितरण झाले नाही व निधी वाटपात पक्षपात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे की, सरकारमध्ये काँगेसची उपेक्षा होत असून काँगेस एकाकी पडली आहे. याबाबत हे अकरा जण दिल्लीत जाऊन सोनिया गांधींकडे तक्रार करणार आहेत. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांना या घटनांमुळे आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला टोला लगावला आहे.

काँग्रेसच्या नाराजीवर काय म्हणते शिवसेना?- काँगेसचे महाराष्ट्रातील नेते विकास निधी संदर्भात जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. किंबहुना बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत यांसारखी नेते मंडळी सरकारमध्ये आहेत व सरकार पाच वर्षे चालवायचेच यासाठी ते शर्थ करीत आहेत. महाराष्ट्रातील 'आघाडी' सरकार चालावे व राज्यावरील राजकीय इडापीडा टळावी यासाठीच तीन पक्षांचे सध्याचे सरकार निर्माण झाले.- देशाची स्थिती तशी बरी नाही. खुद्द राष्ट्रीय काँगेस पक्षात अनेक कारणांनी अस्थिरता व अस्वस्थता आहे. देशात मोदींचे सरकार आहेच, पण एका सक्रिय विरोधी पक्षाची संसदीय लोकशाही व्यवस्थेत तितकीच गरज आहे. काँगेसने सध्या अशा मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी असे जनमत तयार झाले आहे, पण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी काँगेसचे आमदार स्वतःच सहभागी असलेल्या सरकारविरोधात उपोषणाला बसत आहेत. - काँग्रेस आमदारांच्या उपोषणाचा पवित्रा ही लोकशाही वगैरे आहे हे मान्य, पण त्यामुळे ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल.- प्रत्येक मतदारसंघाचा विकास म्हणजेच राज्याचा विकास हे सूत्र मोडले ते मागच्या भाजप सरकारने. शिवसेनेसह सर्वच इतर पक्षांच्या आमदारांना डावलून फक्त भाजपच्याच आमदारांवर विकास निधीचा पाऊस फडणवीस सरकारने पाडला. त्यावरही टीका झालीच होती, पण टीकेची पर्वा करतील ते भाजपवाले कसले? 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाणAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस