शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

"शेतकरी सोबत नसते तर आज भाजपला स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळालं नसतं" 

By मोरेश्वर येरम | Published: December 14, 2020 8:20 PM

"राहुल गांधींना फक्त ट्विट करता येतं. पण त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नाही हे वास्तव आहे"

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावरुन संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर निशाणाराहुल गांधींना शेतीतलं काही कळत नसल्याची केली टीकादेशातील शेतकरी, मजूर आणि गरीब मोदींसोबत असल्याचा दावा

नवी दिल्ली

नवे कृषी कायदे आणल्यानंतरही देशातील शेतकरी मोदी सरकारसोबत असल्याचं विधान भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. 

संबित पात्रा यांनी यावेळी गोवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ दिला. "कृषी कायदे जाहीर केल्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं आहे. कारण मोदींनी देशातील गरीब आणि शेतकरी वर्गाचं नेहमी हीत पाहिलं आहे. राहुल गांधींना फक्त ट्विट करता येतं. पण त्यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीच कळत नाही हे वास्तव आहे", असं संबित पात्रा म्हणाले. 

"गोवा जिल्हा परिषदेचे निकाल देखील हाती आले आहेत. बिहार विधानसभेपासून ते आतापर्यंत लागलेल्या सर्व निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. देशातील शेतकरी जर मोदींसोबत नसता तर इतकं यश मिळालं असतं का?", असा सवाल संबित पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.

"शेतकरी आंदोलनाला कोण हायजॅक करू पाहातंय हे सर्वांना माहित आहे. माध्यमांमध्ये सारंकाही दाखवलं जात आहे आणि आपण काही लोकांना पंतप्रधान मोदींविरोधात अभद्र भाषेत टीका करताना देखील पाहिलं आहे", असा आरोप संबित यांनी केला आहे. 

आसाम, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, गोवा येथील सर्वच स्थानिक आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं आहे. "गाव, गरीब, किसान आणि मजूर हे देशाचा कणा आहेत. हे जर केंद्र सरकारसोबत नसते तर आज निवडणुकांचे निकाल वेगळे असते. मणिपूरपासून कच्छपर्यंत १२ राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. कोरोना, प्रवासी मजूर, कृषी कायदे आणि आर्थिक संकट या चार मुद्द्यांवरुन विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण आत्मनिर्भर भारताचा विजय झाला आहे. देशातील ८० कोटी गरीब जनतेपर्यंत धान्य पुरवण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे", असं संबित पात्रा म्हणाले.

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संप