शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”; भाजपची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 15:41 IST

मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे.

मुंबई:मंत्रालयासारख्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मंजुरी देत असल्याची घोषणा करताना मॉल्स आणि मंदिरे खुली करण्याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. यावरून, मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे. (bjp tushar bhosale criticized thackeray govt over not open temples in state and liquor bottles found in mantralaya)

“राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल

भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अलीकडेच त्यांनी मंदिराच्या विषयावरुन ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. सगळे खुले केले, मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

 ठाकरे सरकारचे नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल 

साधू-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचं नाव काळया अक्षराने लिहिलं जाईल. कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे. मंत्रालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या आणि मंत्रालयातील फायलींमध्ये दारु धार्जिणी धोरण असल्याचा घणाघात तुषार भोसले यांनी केला आहे. या सरकारने मंत्रालयाचं रुपांतर मदिरालयात केलय. मग देवालय कशी उघडणार, अशी विचारणा करत ठाकरे सरकारने मदिरेचा विषय बाजूला ठेवून मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. 

दरम्यान, आता सगळे काही सुरू झालेले असताना, मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील सरकारने घ्यावा. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. मंदिरे खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, सगळे खुले झाले, मग मंदिर बंद नकोत, अशी आग्रही मागणी आचार्य तुषार भोसले यांनी यापूर्वीही केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिरBJPभाजपाMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकारMantralayaमंत्रालय