शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”; भाजपची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 15:41 IST

मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे.

मुंबई:मंत्रालयासारख्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मंजुरी देत असल्याची घोषणा करताना मॉल्स आणि मंदिरे खुली करण्याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. यावरून, मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे. (bjp tushar bhosale criticized thackeray govt over not open temples in state and liquor bottles found in mantralaya)

“राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल

भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अलीकडेच त्यांनी मंदिराच्या विषयावरुन ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. सगळे खुले केले, मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

 ठाकरे सरकारचे नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल 

साधू-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचं नाव काळया अक्षराने लिहिलं जाईल. कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे. मंत्रालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या आणि मंत्रालयातील फायलींमध्ये दारु धार्जिणी धोरण असल्याचा घणाघात तुषार भोसले यांनी केला आहे. या सरकारने मंत्रालयाचं रुपांतर मदिरालयात केलय. मग देवालय कशी उघडणार, अशी विचारणा करत ठाकरे सरकारने मदिरेचा विषय बाजूला ठेवून मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे. 

दरम्यान, आता सगळे काही सुरू झालेले असताना, मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील सरकारने घ्यावा. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. मंदिरे खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, सगळे खुले झाले, मग मंदिर बंद नकोत, अशी आग्रही मागणी आचार्य तुषार भोसले यांनी यापूर्वीही केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेTempleमंदिरBJPभाजपाMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकारMantralayaमंत्रालय